शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:28 IST

मागील वर्षी ६८ शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालय तारखांवर तारखा देत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रिया विलंब होत आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अजूनपर्यंत बदल्यांची प्रक्रिया अंतिम झाली नाही.

ठळक मुद्दे१५ ला सुनावणी : ६८ शिक्षकांची याचिका नागपूर खंडपीठात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षी ६८ शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालय तारखांवर तारखा देत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रिया विलंब होत आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अजूनपर्यंत बदल्यांची प्रक्रिया अंतिम झाली नाही.गडचिरोली जिल्ह्याचा काही भाग सर्वसाधारण तर काही भाग दुर्गम व नक्षल प्रभावित आहे. दुर्गम व नक्षल प्रभावित भागात शिक्षक सेवा देण्यास तयार होत नाही. यापूर्वीही अनेक वेळा याचिका दाखल होत असल्याने बदली प्रक्रिया दरवर्षीच रखडत होती. मोठ्या प्रमाणात गैरव्यवहारही होत होते. मागील वर्षीपासून शासनाने शिक्षकांची आॅनलाईन बदली सुरू केली आहे. आॅनलाईन बदलीमध्ये तरी दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या होतील, अशी आशा शिक्षक बाळगुण होते. मात्र मागील वर्षी सुध्दा जिल्ह्यातील ६८ शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेचा अजूनपर्यंत निकाल लागलेला नाही. मागील सुनावणीदरम्यान ८ जुलैची तारीख दिली होती. ८ जुलै रोजी सुनावणी होऊन पुन्हा १५ जुलैची तारीख दिली आहे. न्यायालयाचा अंतिम निकाल लागला नसल्याने बदली प्रक्रिया पुढे नेण्यास शिक्षण विभागाला अडचण जात आहे. न्यायालयाच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा करणे एवढेच शिक्षण विभाग व शिक्षकांच्या हातात आहे.बदली होणाऱ्या शिक्षकांना त्यांचे कुटुंब संबंधित तालुक्यात हलविण्यासाठी वेळ मिळावी, या दृष्टीने मे महिन्यातच बदली प्रक्रिया आटोपण्याचे निर्देश आहेत. यावर्षी मात्र जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपूनही बदली झाली नाही. जर पुढे बदली झाली तर, शिक्षकांना फार मोठी अडचण येणार आहे. त्यांच्या पाल्यांच्या अ‍ॅडमिशन संबंधित शहरात व तालुक्याच्या ठिकाणी झाल्या आहेत. ऐन वेळेवर अ‍ॅडमिशन काढून कुटुंब हलविणे शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकाला कुटुंबापासून दूर राहावे लागणार आहे.दुर्गम भागातील शिक्षकांवर अन्यायदर तीन वर्षांनी बदल्या करण्याचा निर्णय शासनाने बदलीच्या शासन निर्णयात घेतला आहे. मात्र याची अंमलबजावणी कोर्टकचेऱ्यांमुळे करण्यास अडचणी येत आहेत. दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांना यावर्षी बदली होईल, अशी अपेक्षा होती. मात्र बदली झाली नसल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. हा अन्याय दूर करावा, अशी मागणी होत आहे.