शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

राजोलीवासीयांचा सुविधांसाठी संघर्ष

By admin | Updated: December 24, 2015 02:03 IST

तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या राजोली गावात स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही पक्के रस्ते तयार झाले नाही.

रस्ता हवा, बस हवी : नदीवरचा पूल पुरात वाहून गेला धानोरा : तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या राजोली गावात स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही पक्के रस्ते तयार झाले नाही. परिणामी महामंडळाची बसही येत नाही. पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत समस्या कायम आहेत. परिणामी प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे राजोली गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजोली गावाजवळून वाहणाऱ्या कठाणी नदीमुळे पुलांअभावी पावसाळ्यात या गावाचा संपर्क तालुका व जिल्हा मुख्यालयाशी तुटतो. राजोली गावाकडे जाणाऱ्या मार्गावर कठाणी नदीवर चार वर्षांपूर्वी लाखो रूपये खर्च करून पूल बांधण्यात आला. मात्र या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे व नियोजनबद्ध पद्धतीने न झाल्यामुळे दोन वर्षातच पुराच्या पाण्यामुळे सदर पूल वाहून गेला. तेव्हापासून या पुलाची संबंधित विभागाने दुरूस्ती केली नाही. तसेच याठिकाणी नवा पूल उभारलाही नाही. नव्या सरकारने राजोली गावाच्या मार्गावर नवा पूल बांधकामासाठी २३ लाख रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती ग्रामस्थांना प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात येथे नव्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. गावातील समस्यांबाबत अनेकदा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. मात्र गावाच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे.