शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:34 IST

गडचिरोली : आपल्या देशात रस्त्याच्या लांबीबरोबर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; पण त्यामानाने लोकांकडून आवश्यक प्रमाणात रस्ता ...

गडचिरोली : आपल्या देशात रस्त्याच्या लांबीबरोबर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; पण त्यामानाने लोकांकडून आवश्यक प्रमाणात रस्ता सुरक्षा नियमांचे पालन होताना दिसत नाही. पर्यायाने दरवर्षी ५ लाख लोकांचे अपघात रस्त्यावर घडतात. त्यापैकी दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागते, ही बाब चिंताजनक आहे. म्हणून अपघात विरहित जीवनासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले.

गडचिराेली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संस्थेच्या परिसरात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके होते. याप्रसंगी नॕॅशनल हायवे ऑथाेरिटीचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, शाखा अभियंता आशिष आवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, जिल्हा वाहतूक शाखेच्या गोरे, माेटार वाहन निरीक्षक शफिक उचगावकर, चेतन पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू कावळे आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विवेक मिश्रा आणि शफीक उचगावकर यांनी रस्ते नियम आणि नागरिकांची जबाबदारी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रासेयाे कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम, सूत्रसंचालन संतोष बोंद्रे तर आभार विवेक गढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिदेशक तसेच कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.