शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांना पत्र पाठवून जनहित याचिकेला बळ द्या

By admin | Updated: March 13, 2016 01:23 IST

शेतकऱ्यांची संपूर्ण शेती कर्जातून मुक्तता करण्यात यावी, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, ...

पत्रकार परिषद : शंकर धोंडगे यांचे आवाहन गडचिरोली : शेतकऱ्यांची संपूर्ण शेती कर्जातून मुक्तता करण्यात यावी, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा अशी किंमत शेतमालाला देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांना धरून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बाजुने निकाल लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीशांना (नागपूर खंडपीठ) यांना पत्र पाठवावे, असे आवाहन शेतकरी, शेतमजूर कृती समितीचे संयोजक शंकर धोंडगे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. राष्ट्रवादी किसान सभेची बैठक जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी माहिती देताना शंकर धोंडगे म्हणाले की, संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे चारा व पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे सततच्या नैराश्याने शेतकरी वर्ग आत्महत्या करीत आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या न्याय व हक्कासाठी न्यायालयीन लढाही लढण्याच्या उद्देशाने औरंगाबाद खंडपीठात ५ जानेवारी २०१६ रोजी घटनेच्या कलम २१ अन्वये शेतकरी, शेतमजुरांना माणूस म्हणून जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारावर सरकारकडून अडथळा निर्माण केला जात असल्याबद्दल पुराव्यानिशी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने चार आठवड्यात सरकारला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजुने लागण्यासाठी मुख्य न्यायाधीशांना शेतकऱ्यांनी पत्र पाठवावे. पत्राचा नमुना व लिपाफा तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केवळ पत्राच्या खाली स्वत:चे नाव, गाव, पत्ता लिहून सही करायची आहे व स्वत:कडचे पाच रूपये खर्च करून पोस्टाचे तिकीट चिकटवायचे आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पत्र पाठवावे, असे आवाहन शंकर धोंडगे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला किसानसभेचे राज्यकार्यवाह किशोर माथनकर, दत्ता पवार, पक्षनिरिक्षक राजू वैद्य, राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, किसानसभेचे अध्यक्ष प्रकाश ताकसांडे, अ‍ॅड. संजय ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष हर्षलता येलमुले, सोनाली पुण्यपवार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)