शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

न्यायाधीशांना पत्र पाठवून जनहित याचिकेला बळ द्या

By admin | Updated: March 13, 2016 01:23 IST

शेतकऱ्यांची संपूर्ण शेती कर्जातून मुक्तता करण्यात यावी, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, ...

पत्रकार परिषद : शंकर धोंडगे यांचे आवाहन गडचिरोली : शेतकऱ्यांची संपूर्ण शेती कर्जातून मुक्तता करण्यात यावी, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा अशी किंमत शेतमालाला देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांना धरून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बाजुने निकाल लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीशांना (नागपूर खंडपीठ) यांना पत्र पाठवावे, असे आवाहन शेतकरी, शेतमजूर कृती समितीचे संयोजक शंकर धोंडगे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. राष्ट्रवादी किसान सभेची बैठक जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी माहिती देताना शंकर धोंडगे म्हणाले की, संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे चारा व पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे सततच्या नैराश्याने शेतकरी वर्ग आत्महत्या करीत आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या न्याय व हक्कासाठी न्यायालयीन लढाही लढण्याच्या उद्देशाने औरंगाबाद खंडपीठात ५ जानेवारी २०१६ रोजी घटनेच्या कलम २१ अन्वये शेतकरी, शेतमजुरांना माणूस म्हणून जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारावर सरकारकडून अडथळा निर्माण केला जात असल्याबद्दल पुराव्यानिशी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने चार आठवड्यात सरकारला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजुने लागण्यासाठी मुख्य न्यायाधीशांना शेतकऱ्यांनी पत्र पाठवावे. पत्राचा नमुना व लिपाफा तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केवळ पत्राच्या खाली स्वत:चे नाव, गाव, पत्ता लिहून सही करायची आहे व स्वत:कडचे पाच रूपये खर्च करून पोस्टाचे तिकीट चिकटवायचे आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पत्र पाठवावे, असे आवाहन शंकर धोंडगे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला किसानसभेचे राज्यकार्यवाह किशोर माथनकर, दत्ता पवार, पक्षनिरिक्षक राजू वैद्य, राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, किसानसभेचे अध्यक्ष प्रकाश ताकसांडे, अ‍ॅड. संजय ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष हर्षलता येलमुले, सोनाली पुण्यपवार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)