शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने गुरांचा गोठा कोसळला

By admin | Updated: May 28, 2017 01:20 IST

२६ मे च्या रात्री झालेल्या वादळामुळे तालुक्यातील घारगाव येथील निशांत सुखदेव नैताम यांच्या गोठ्याचे टीनपत्रे उडून गेले.

तीन लाखांचे नुकसान : दुधाळ जनावरे झाली जखमी लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : २६ मे च्या रात्री झालेल्या वादळामुळे तालुक्यातील घारगाव येथील निशांत सुखदेव नैताम यांच्या गोठ्याचे टीनपत्रे उडून गेले. यामध्ये नैताम यांचे जवळपास तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घारगाव परिसरात २६ मे च्या रात्री प्रचंड प्रमाणात वादळ झाले. या वादळामुळे अनेकांच्या घरावरील कवेलू उडून गेले. निशांत नैताम यांनी दुधाळ जनावरांसाठी टीनपत्र्यांचा गोठा तयार केला आहे. या गोठ्यात गायी व म्हशी बांधून ठेवण्यात आल्या होत्या. वादळामुळे गोठा कोसळला. त्याचबरोबर टीनाचे पत्रे उडून गेले. याबाबतची माहिती जिल्हा परिषद सदस्य कविता प्रमोद भगत यांना माहीत होताच त्यांनी घटनास्थळ गाठले व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत, घारगावचे उपसरपंच नामदेव झलके, पोलीस पाटील हेमाजी आभारे उपस्थित होते. तलाठी एन. एच. चंदनखेडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केला. गोठ्यामध्ये १२ म्हशी व ६ वगाळू होते. ते जखमी झाले आहेत. गोठा कोसळल्याने गुरांना ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नैताम यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी निशांत नैताम व जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी केली आहे.