शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

ग्रा.पं.वर प्रशासकांच्या नियुक्तीवरून उठले वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे होते. मात्र १३ जुलैला राज्य शासनाने काढलेल्या जीआरनुसार आता पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार सदर नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहे. अनेक जिल्ह्यात पालकमंत्री हे दुसºया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे पालकत्व असलेल्या जिल्ह्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना अधिकार : आमदारांसह अनेकांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुदत संपणाऱ्या किंवा संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे सध्या शक्य नसल्यामुळे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना देणारा शासन आदेश सोमवारी (दि.१३) काढण्यात आला. त्यावरून जिल्ह्यात राजकीय मंडळींनी वादळ उठवले आहे. हे अधिकार आमदारांना असावे अशी मागणी आमदारांनी केली तर काही मंडळींनी राजकीय व्यक्तीकडे हे अधिकारच नको, अशीही भावना व्यक्त केली आहे.ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे होते. मात्र १३ जुलैला राज्य शासनाने काढलेल्या जीआरनुसार आता पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार सदर नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहे. अनेक जिल्ह्यात पालकमंत्री हे दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे पालकत्व असलेल्या जिल्ह्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. असे असताना त्यांना यासंदर्भातील अधिकार देणे ही बाब स्थानिक लोकांवर अन्याय करणारी असून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार त्या क्षेत्राच्या आमदारांना द्यावे अशी मागणी गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते व ग्रामविकास मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. याच पद्धतीची मागणी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनीही केली आहे.समाजमाध्यमावरही या विषयावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात काही लोकांनी नेमणुकीच्या शिफारसीचे अधिकार राजकीय लोकांना देण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ठेवावे आणि त्यांनी पूर्वीप्रमाणे कनिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी किंवा चारित्र्य तपासून माजी सरपंचांची नेमणूक करावी अशी भावना व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्त्या दोन महिन्यांपूर्वीच झाल्या आहेत. पण आता नव्याने नियुक्त्या होऊ शकतात.२०० वर ग्रामपंचायतींवर प्रशासकगडचिरोली जिल्ह्यातील २०० वर ग्रामपंचायतींची मुदत जून महिन्यापूर्वीच संपल्यामुळे त्या ग्रामपंचायतींवर आधीच विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. एका विस्तार अधिकाऱ्याकडे अनेक ग्रामपंचायतींचा प्रभार आहे. आता या नवीन जीआरमुळे त्या सर्व ग्रामपंचायतींवर नव्याने प्रशासकांच्या नियुक्त्या होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संवैधानिक बाधा निर्माण होण्याची शक्यता?राज्यातील आघाडी सरकारचा मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून सदर शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. या शासन निर्णयामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि राज्यघटनेत ९३ वीज दुरूस्ती करून भारतीय पंचायत व्यवस्था लोकाभिमुख करण्याच्या केलेल्या प्रयत्नांना संवैधानिक बाधा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे. ग्रामीण स्तरावर सत्तापक्षाचे प्राबल्य वाढविण्याचा हा प्रयत्न असल्याची टिका जराते यांनी केली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत