शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

झिंगानूर-सिरकोंडा मार्गावरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:13 IST

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

ठळक मुद्देचिखलाचे साम्राज्य : पुलाच्या बाजूवरील कच्चा मुरूम वाहून गेला

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर झिंगानूर गावानजीक एक नाला आहे. या नाल्याची उंची वाढविण्यासाठीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, या उद्देशाने पुलाच्या लगत कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर कच्च्या रस्ता मुरूम टाकून तयार करण्यात आला. मृग व आद्रा नक्षत्राच्या सुरूवातीच्या पावसाने हा मुरूम व्यवस्थित बसला. मात्र त्यानंतर १६ जुलै रोजी गडचिरोली शहरसह सिरोंचा व अहेरी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. या पावसादरम्यान पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावर टाकलेला मुरूम वाहून गेला. त्यामुळे आता या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरील चिखलात फसत आहेत. मात्र त्यानंतर स्थानिक प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने सदर मार्गावर गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला नाही. चिखलमय झालेल्या या रस्त्यावर तत्काळ मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरात अनेक ठिकाणी नाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील मोठ्या नद्यांना पूर येते. नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर नाल्यावरही पाणी चढते. त्यामुळे या भागातील वाहतूक मुसळधार पावसादरम्यान अनेकदा खंडीत होते. शासन व प्रशासनाच्या वतीने या संदर्भात अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने झिंगानूर परिसरातील नागरिकांना आवागमनासाठी मोठी कसरत करावी लागते.अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा कायमएटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा व अहेरी या आदी पाच तालुके अहेरी उपविभागात मोडतात. गडचिरोली जिल्हा निर्मितीला ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा अद्यापही कायम आहे. एटापल्ली तालुक्यातील अनेक मुख्य डांबरी रस्ते उखडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक होत आहे. भामरागड व सिरोंचा शहरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बकाल झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मजबूत व दर्जेदार होण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तशी मागणीही अहेरी उपविभागातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. अहेरी उपविभागात अनेक मुख्य रस्त्यालगत मोठे झाडे असून या झाडांच्या फांद्याही वाढल्या आहेत. वादळाने झाडे रस्त्यावर कोसळून रहदारीस अडथळा निर्माण होत असते.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक