शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

झिंगानूर-सिरकोंडा मार्गावरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:13 IST

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

ठळक मुद्देचिखलाचे साम्राज्य : पुलाच्या बाजूवरील कच्चा मुरूम वाहून गेला

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर झिंगानूर गावानजीक एक नाला आहे. या नाल्याची उंची वाढविण्यासाठीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, या उद्देशाने पुलाच्या लगत कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर कच्च्या रस्ता मुरूम टाकून तयार करण्यात आला. मृग व आद्रा नक्षत्राच्या सुरूवातीच्या पावसाने हा मुरूम व्यवस्थित बसला. मात्र त्यानंतर १६ जुलै रोजी गडचिरोली शहरसह सिरोंचा व अहेरी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. या पावसादरम्यान पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावर टाकलेला मुरूम वाहून गेला. त्यामुळे आता या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरील चिखलात फसत आहेत. मात्र त्यानंतर स्थानिक प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने सदर मार्गावर गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला नाही. चिखलमय झालेल्या या रस्त्यावर तत्काळ मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरात अनेक ठिकाणी नाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील मोठ्या नद्यांना पूर येते. नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर नाल्यावरही पाणी चढते. त्यामुळे या भागातील वाहतूक मुसळधार पावसादरम्यान अनेकदा खंडीत होते. शासन व प्रशासनाच्या वतीने या संदर्भात अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने झिंगानूर परिसरातील नागरिकांना आवागमनासाठी मोठी कसरत करावी लागते.अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा कायमएटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा व अहेरी या आदी पाच तालुके अहेरी उपविभागात मोडतात. गडचिरोली जिल्हा निर्मितीला ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा अद्यापही कायम आहे. एटापल्ली तालुक्यातील अनेक मुख्य डांबरी रस्ते उखडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक होत आहे. भामरागड व सिरोंचा शहरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बकाल झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मजबूत व दर्जेदार होण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तशी मागणीही अहेरी उपविभागातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. अहेरी उपविभागात अनेक मुख्य रस्त्यालगत मोठे झाडे असून या झाडांच्या फांद्याही वाढल्या आहेत. वादळाने झाडे रस्त्यावर कोसळून रहदारीस अडथळा निर्माण होत असते.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक