शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
गिल 'गोल्डन डक' झाला अन् 'डगआउट'मध्ये बसलेल्या संजूसह पुन्हा चर्चेत आला 'वशीलेबाजी'चा मुद्दा
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

झिंगानूर-सिरकोंडा मार्गावरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:13 IST

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

ठळक मुद्देचिखलाचे साम्राज्य : पुलाच्या बाजूवरील कच्चा मुरूम वाहून गेला

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर झिंगानूर गावानजीक एक नाला आहे. या नाल्याची उंची वाढविण्यासाठीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, या उद्देशाने पुलाच्या लगत कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर कच्च्या रस्ता मुरूम टाकून तयार करण्यात आला. मृग व आद्रा नक्षत्राच्या सुरूवातीच्या पावसाने हा मुरूम व्यवस्थित बसला. मात्र त्यानंतर १६ जुलै रोजी गडचिरोली शहरसह सिरोंचा व अहेरी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. या पावसादरम्यान पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावर टाकलेला मुरूम वाहून गेला. त्यामुळे आता या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरील चिखलात फसत आहेत. मात्र त्यानंतर स्थानिक प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने सदर मार्गावर गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला नाही. चिखलमय झालेल्या या रस्त्यावर तत्काळ मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरात अनेक ठिकाणी नाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील मोठ्या नद्यांना पूर येते. नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर नाल्यावरही पाणी चढते. त्यामुळे या भागातील वाहतूक मुसळधार पावसादरम्यान अनेकदा खंडीत होते. शासन व प्रशासनाच्या वतीने या संदर्भात अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने झिंगानूर परिसरातील नागरिकांना आवागमनासाठी मोठी कसरत करावी लागते.अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा कायमएटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा व अहेरी या आदी पाच तालुके अहेरी उपविभागात मोडतात. गडचिरोली जिल्हा निर्मितीला ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा अद्यापही कायम आहे. एटापल्ली तालुक्यातील अनेक मुख्य डांबरी रस्ते उखडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक होत आहे. भामरागड व सिरोंचा शहरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बकाल झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मजबूत व दर्जेदार होण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तशी मागणीही अहेरी उपविभागातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. अहेरी उपविभागात अनेक मुख्य रस्त्यालगत मोठे झाडे असून या झाडांच्या फांद्याही वाढल्या आहेत. वादळाने झाडे रस्त्यावर कोसळून रहदारीस अडथळा निर्माण होत असते.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक