लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आमच्या शाळेच्या जवळच खर्राविक्री होते. काही मित्रांनाही त्यामुळे सवयी लागल्या आहेत. त्यामुळे हे पानठेले बंद करा, शाळेतील शिक्षकही खर्रा खाऊन येतात, गावातही खूप पानठेले आहेत ते बंद करा अशी एकमुखी मागणी तालुक्यातील तब्बल २ हजार २२१ विद्यार्थ्यांनी केली. तालुक्यातील विविध शाळांमध्ये मुक्तिपथ अंतर्गत आयोजित मुक्तिदिन कार्यक्रमात पत्राद्वारे विद्यार्थांनी या भावना व्यक्त केल्या.विद्यार्थ्यांना दारू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम कळून बालपण व्यसनमुक्त आणि निरोगी राहावे यासाठी मुक्तिपथ चमूद्वारे तालुक्यातील १३ शाळांमध्ये मुक्तिदिन कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पत्रलेखन, गीतगायन, व्यसनमुक्तीचा संकल्प यासह इतरही उपक्रमांतून व्यसनमुक्त राहण्याचा तसेच शाळा व आपले गाव दारू, खर्रा व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला.आरमोरी तालुक्यात इंदिरा आश्रमशाळा सुकाळा, सरस्वती विद्यालय पळसगाव, जि. प. शाळा शिवनी बू., वैनगंगा विद्यालय चुरमुरा, कर्मवीर विद्यालय वासाळा, महात्मा फुले हायस्कूल देऊळगाव, मातोश्री विद्यालय पिसेवडधा, शासकीय आश्रमशाळा भाकरोंडी, शासकीय आश्रमशाळा कुरंडीमाल, प्रीती आदिवासी आश्रमशाळा आरमोरी, आकाश विद्यालय मोहझरी, जि. प. शाळा जोगीसाखरा आणि सरस्वती विद्यालय सिर्सी येथील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांतून शाळा खर्रा व तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार केला.शाळेच्या जवळ असलेले पानठेले बंद करावे, त्याचबरोबर गावात सुरू असलेले पानठेलाधारकांवर कारवाई, गावातील दारूविक्री बंद करण्याची मागणी अशा विविध विषयांवर २ हजार २२१ विद्यार्थ्यांनी प्रशासनाला पत्रे लिहिली. पोस्टर मेकिंग स्पर्धेत दारू व तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम, गावात होणारे भांडणतंटे, वाढती गुन्हेगारी असे विविध विषय चित्रांतून मांडले. व्यसनमुक्तीची गाणी विद्यार्थ्यांनी सादर केली. याप्रसंगी तालुका संघटक नीलम हरिणखेडे, प्रेरक प्रकाश कुनघाडकर हजर होते.
शाळांलगतची खर्राविक्री थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST
पानठेले बंद करा, शाळेतील शिक्षकही खर्रा खाऊन येतात, गावातही खूप पानठेले आहेत ते बंद करा अशी एकमुखी मागणी तालुक्यातील तब्बल २ हजार २२१ विद्यार्थ्यांनी केली. तालुक्यातील विविध शाळांमध्ये मुक्तिपथ अंतर्गत आयोजित मुक्तिदिन कार्यक्रमात पत्राद्वारे विद्यार्थांनी या भावना व्यक्त केल्या.
शाळांलगतची खर्राविक्री थांबवा
ठळक मुद्दे१३ शाळांमध्ये मुक्तिदिन कार्यक्रम : २ हजार २२१ विद्यार्थ्यांनी पत्रांमधून व्यक्त केली भावना