शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: July 2, 2016 02:00 IST

मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन पाडल्याच्या विरोधात बुधवार (दि.२९) आंबेडकरी समाजाद्वारे...

गोंदिया : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन पाडल्याच्या विरोधात बुधवार (दि.२९) आंबेडकरी समाजाद्वारे शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील मुख्य रस्ता जवळपास अर्ध्या तासापर्यंत थांबवून ठेवण्यात आला. भवन पाडण्यात मुख्य आरोपी रत्नाकर गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांना अविलंब अटक करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. आंदोलनकर्त्यांमध्ये प्रामुख्याने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व भारिप बहुजन महासंघ या संघटनांच्या जिल्हाभरातील हजारो कार्यकर्त्यांचा समावेश होता. सदर रास्ता रोको आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खोब्रागडे, समता सैनिक दलाचे कमांडींग आॅफिसर जितेंद्र मेश्राम व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष देवाराम मेश्राम यांनी सांगितले की, एकीकडे शासन लंडन स्थित बाबासाहेबांचे घर चाळीस कोटीमध्ये व मुंबई येथील इंदू मिलची जमीन बाबासाहेबांच्या स्मारकासाठी खरेदी करण्याच्या गोष्टी सांगतात. तर दुसरीकडे आंबेडकरी व बहुजन समाजाच्या राजकीय, सामाजिक व संघटनात्मकरित्या जुडलेल्या भवनास असामाजिक तत्वांद्वारे मध्यरात्री तोडल्यावरही आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही. सन १९४४ मध्ये बाबासाहेबांनी मुंबईच्या दादर परिसरात सदर जमीन खरेदी करून आंबेडकर भवनाचे बांधकाम केले होते. याच भवनात बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसची स्थापना करून मुकनायक व बहिस्कृत भारत वर्तमानपत्रे चालवित होते. एवढेच नव्हे तर आंबेडकरी-बहुजन समाजाचे उद्धार करणारे कार्य याच भवनात बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविले होते. संपूर्ण आंबेडकरी बहुजन समाजाच्या या भवनातून राजकीय, सामाजिक व संघटनात्मक नाता जुडलेला आहे. त्यामुळे भवन पाडणाऱ्यांना अविलंब अटक करण्याची मागणी सदर रास्ता रोको आंदोलनात करण्यात आली आहे. अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)