शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी बसेस थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थिनी एकवटल्या : आष्टीच्या एसटी नियंत्रकांमार्फत आगाराला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र सदर बससेवा परवडत नसल्याच्या कारणावरून महामंडळाच्या वतीने या बसगाडीमध्ये इतरही प्रवासी बसविले जातात. परिणामी प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.आष्टी भागातील जि.प.सदस्य रूपाली पंदिलवार, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांच्या नेतृत्त्वात ठाकरी, इल्लूर, कुनघाडा व चपराळा आदी गावातील विद्यार्थ्यांनी आष्टी येथील एसटीच्या नियंत्रकांना भेटून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातून आष्टी भागातील सदर चार ते पाच गावांमध्ये मानव विकास मिशनच्या बसगाड्या थांबवून विद्यार्थिनींना शाळेच्या गावापर्यंत पोहोचविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, आष्टी परिसरातील ठाकरी, इल्लूर, कुनघाडा, चपराळा येथील जवळपास २०० विद्यार्थी शिक्षणासाठी आष्टी येथे ये-जा करीत असतात. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने बसगाड्यांमध्ये कोंबून नेले जाते. बरेचदा बसमध्ये जागा शिल्लक नसल्याच्या कारणावरून बसचालक बसगाड्या प्रवाशी थांब्यावर थांबवित नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते. महामंडळाच्या चालक व वाहकाच्या अशा प्रकारामुळे आष्टी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, अन्यथा महामंडळाच्या विरोधात आंदोलन करणार, असा इशारा संजय पंदिलवार यांच्यासह विद्यार्थिनींनी दिला आहे.यापूर्वी भोगनबोडी मार्गे येणारी बस चपराळापर्यंत जात होती. ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी, मार्र्कंडा (कं.) या बसथांब्यावर जलद बसगाड्या विद्यार्थ्यांसाठी थांबविण्यात याव्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक