शहरं
Join us  
Trending Stories
1
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
2
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
3
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
4
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
5
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
6
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
7
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
8
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
9
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
10
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
11
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
12
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं
13
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
14
Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती?
15
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
16
सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
17
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
18
विमान प्रवास होणार स्वस्त? विमान इंधनाच्या किमती सलग तिसऱ्यांदा घटल्या; काय आहेत सध्याचे दर?

विद्यार्थ्यांसाठी बसेस थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थिनी एकवटल्या : आष्टीच्या एसटी नियंत्रकांमार्फत आगाराला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र सदर बससेवा परवडत नसल्याच्या कारणावरून महामंडळाच्या वतीने या बसगाडीमध्ये इतरही प्रवासी बसविले जातात. परिणामी प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.आष्टी भागातील जि.प.सदस्य रूपाली पंदिलवार, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांच्या नेतृत्त्वात ठाकरी, इल्लूर, कुनघाडा व चपराळा आदी गावातील विद्यार्थ्यांनी आष्टी येथील एसटीच्या नियंत्रकांना भेटून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातून आष्टी भागातील सदर चार ते पाच गावांमध्ये मानव विकास मिशनच्या बसगाड्या थांबवून विद्यार्थिनींना शाळेच्या गावापर्यंत पोहोचविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, आष्टी परिसरातील ठाकरी, इल्लूर, कुनघाडा, चपराळा येथील जवळपास २०० विद्यार्थी शिक्षणासाठी आष्टी येथे ये-जा करीत असतात. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने बसगाड्यांमध्ये कोंबून नेले जाते. बरेचदा बसमध्ये जागा शिल्लक नसल्याच्या कारणावरून बसचालक बसगाड्या प्रवाशी थांब्यावर थांबवित नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते. महामंडळाच्या चालक व वाहकाच्या अशा प्रकारामुळे आष्टी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, अन्यथा महामंडळाच्या विरोधात आंदोलन करणार, असा इशारा संजय पंदिलवार यांच्यासह विद्यार्थिनींनी दिला आहे.यापूर्वी भोगनबोडी मार्गे येणारी बस चपराळापर्यंत जात होती. ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी, मार्र्कंडा (कं.) या बसथांब्यावर जलद बसगाड्या विद्यार्थ्यांसाठी थांबविण्यात याव्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक