शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

सांडपाण्यामुळे तलावात वाढली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

कुरखेडा शहरातील गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरालगत असलेल्या तलावात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देनगर पंचायतीचे दुर्लक्ष : कुरखेडाच्या गांधी वॉर्डातील नागरिकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : शहरातील सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा, यासाठी स्थानिक प्रशासन जबाबदार असते. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसेल तर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. कुरखेडा शहरातील गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरालगत असलेल्या तलावात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कुरखेडा शहराच्या गांधी वॉर्डातील घाण पाणी नालीवाटे तलावात सोडले जात आहे. दैनंदिन वापरातील दूषित पाणी तलावात मिसळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तलावातील पाण्यातून दुर्गंधी येत आहे. विशेष म्हणजे, येथील मंदिरात दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यांना या दुर्गंधीचा त्रास होतो. परिणामी भाविकांसह गांधी वॉर्डातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागू शकतो. नाली वाटे तलावात जाणारे सांडपाणी रोखण्याकडे नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.सांडपाण्यामुळे परिसरात डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून सांडपाणी तलावात न सोडता ते इतर ठिकाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शहरवासीयांनी नगर पंचायत प्रशासनाकडे केली आहे.सौंदर्यीकरणाचे काम लवकर कराकुरखेडा शहरातील हनुमान मंदिर परिसरात असलेल्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतल्यास नागरिकांसाठी सोयीचे होऊ शकते. तलावाच्या सौंदर्यीकरणाचाच एक भाग म्हणून पाळीवर गट्टू लावून रस्ता तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे पाळीवरून आवागमन करणे सोयीचे झाले. येत्या काळात तलावाच्या पाळीवर नागरिकांना बसण्यासाठी बेंच व सभोवताल विद्युत दिवे लावण्याचे काम प्रस्तावित असल्याची माहिती आहे. याशिवाय मंदिर परिसरात असलेल्या खुल्या जागेत गट्टू लावण्यात येणार असल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडू शकते. सकाळ व सायंकाळच्या सुमारास नागरिकांना विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी काही क्षण घालविता येतील. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम लवकर हाती घ्यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक