शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सांडपाण्यामुळे तलावात वाढली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

कुरखेडा शहरातील गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरालगत असलेल्या तलावात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देनगर पंचायतीचे दुर्लक्ष : कुरखेडाच्या गांधी वॉर्डातील नागरिकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : शहरातील सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा, यासाठी स्थानिक प्रशासन जबाबदार असते. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसेल तर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. कुरखेडा शहरातील गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरालगत असलेल्या तलावात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कुरखेडा शहराच्या गांधी वॉर्डातील घाण पाणी नालीवाटे तलावात सोडले जात आहे. दैनंदिन वापरातील दूषित पाणी तलावात मिसळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तलावातील पाण्यातून दुर्गंधी येत आहे. विशेष म्हणजे, येथील मंदिरात दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यांना या दुर्गंधीचा त्रास होतो. परिणामी भाविकांसह गांधी वॉर्डातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागू शकतो. नाली वाटे तलावात जाणारे सांडपाणी रोखण्याकडे नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.सांडपाण्यामुळे परिसरात डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून सांडपाणी तलावात न सोडता ते इतर ठिकाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शहरवासीयांनी नगर पंचायत प्रशासनाकडे केली आहे.सौंदर्यीकरणाचे काम लवकर कराकुरखेडा शहरातील हनुमान मंदिर परिसरात असलेल्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतल्यास नागरिकांसाठी सोयीचे होऊ शकते. तलावाच्या सौंदर्यीकरणाचाच एक भाग म्हणून पाळीवर गट्टू लावून रस्ता तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे पाळीवरून आवागमन करणे सोयीचे झाले. येत्या काळात तलावाच्या पाळीवर नागरिकांना बसण्यासाठी बेंच व सभोवताल विद्युत दिवे लावण्याचे काम प्रस्तावित असल्याची माहिती आहे. याशिवाय मंदिर परिसरात असलेल्या खुल्या जागेत गट्टू लावण्यात येणार असल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडू शकते. सकाळ व सायंकाळच्या सुमारास नागरिकांना विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी काही क्षण घालविता येतील. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम लवकर हाती घ्यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक