शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

क्षेत्रनिहाय मेळाव्यांना आजपासून प्रारंभ

By admin | Updated: December 8, 2014 22:35 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवून स्वच्छता केली जात आहे. यांतर्गत येथील जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. यात जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद

आदर्श ग्राम योजना : आमगावातून होणार श्रीगणेशागोंदिया : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवून स्वच्छता केली जात आहे. यांतर्गत येथील जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. यात जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात जनजागृती मेळाव्यांचे आयोजन केले जाणार असून या मेळाव्यांना ९ डिसेंबर रोजी आमगाव येथून प्रारंभ केला जाणार आहे. सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात असताना आपला जिल्हा यातून सुटू नये तसेच जिल्हा स्वच्छ व सुंदर रहावा यासाठी जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास साधायचा आहे. यामुळे फक्त झाडू मारणे म्हणजे स्वच्छता नसून स्वच्छतेशी निगडीत अन्य बाबींबाबतही जनजागृती करून लोकसहभागातून गावांचा विकास साधणे या उपक्रमातून साध्य करायचे आहे. यासाठीच या जनजागृती मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहेत. पंचायत समिती स्तरावरून या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार असून यासाठी जिल्हा परिषद पंचायत विभागाने काही सूचना दिल्या आहेत. यात, रस्त्यांवरील हागणदारी बंद करणे, शौचालयांचा वापर करणे, व्यक्तिगत शौचालय बांधकामासाठी लाभ देणे, सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती, स्वच्छता व पाण्याची व्यवस्था करून त्यांचा वापर वाढविणे, बाजाराच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, मुख्य चौक व सार्वजनिक जागांत स्वच्छता राखणे, विद्यार्थ्यांना शौचालयाच्या वापराची सवय लावणे आदिंचा समावेश आहे. मेळाव्यांतून वरील बाबींवर क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व लोकांत जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यात ५२ जिल्हा परिषद क्षेत्र असून प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात मेळावे घेतले जाणार आहेत. त्यानुसार ९ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या क्षेत्रातून या मेळाव्यांना प्रारंभ होत असून आमगाव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. लोक प्रतिनिधींसह क्षेत्रातील लोकांत जनजागृती करून त्यांच्या सहभागातून गाव आदर्श गाव बनविण्याचे या उपक्रमांचे उद्दीष्ट असून जनजागृती नंतर गावात स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याचीही माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)