शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

क्षेत्रनिहाय मेळाव्यांना आजपासून प्रारंभ

By admin | Updated: December 8, 2014 22:35 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवून स्वच्छता केली जात आहे. यांतर्गत येथील जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. यात जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद

आदर्श ग्राम योजना : आमगावातून होणार श्रीगणेशागोंदिया : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवून स्वच्छता केली जात आहे. यांतर्गत येथील जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. यात जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात जनजागृती मेळाव्यांचे आयोजन केले जाणार असून या मेळाव्यांना ९ डिसेंबर रोजी आमगाव येथून प्रारंभ केला जाणार आहे. सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात असताना आपला जिल्हा यातून सुटू नये तसेच जिल्हा स्वच्छ व सुंदर रहावा यासाठी जिल्हा परिषदेने आदर्श ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला. उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास साधायचा आहे. यामुळे फक्त झाडू मारणे म्हणजे स्वच्छता नसून स्वच्छतेशी निगडीत अन्य बाबींबाबतही जनजागृती करून लोकसहभागातून गावांचा विकास साधणे या उपक्रमातून साध्य करायचे आहे. यासाठीच या जनजागृती मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहेत. पंचायत समिती स्तरावरून या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार असून यासाठी जिल्हा परिषद पंचायत विभागाने काही सूचना दिल्या आहेत. यात, रस्त्यांवरील हागणदारी बंद करणे, शौचालयांचा वापर करणे, व्यक्तिगत शौचालय बांधकामासाठी लाभ देणे, सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती, स्वच्छता व पाण्याची व्यवस्था करून त्यांचा वापर वाढविणे, बाजाराच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, मुख्य चौक व सार्वजनिक जागांत स्वच्छता राखणे, विद्यार्थ्यांना शौचालयाच्या वापराची सवय लावणे आदिंचा समावेश आहे. मेळाव्यांतून वरील बाबींवर क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व लोकांत जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यात ५२ जिल्हा परिषद क्षेत्र असून प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात मेळावे घेतले जाणार आहेत. त्यानुसार ९ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या क्षेत्रातून या मेळाव्यांना प्रारंभ होत असून आमगाव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. लोक प्रतिनिधींसह क्षेत्रातील लोकांत जनजागृती करून त्यांच्या सहभागातून गाव आदर्श गाव बनविण्याचे या उपक्रमांचे उद्दीष्ट असून जनजागृती नंतर गावात स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याचीही माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)