शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

नक्षलींना न जुमानता पुलाचे काम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:01 IST

देचलीपेठा पंचक्रोशीतील १६ गावातील नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीनुसार किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मंगळवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून उपयोगात आणले जाणारे ट्रॅक्टर, मिक्सर व इतर साहित्य जाळून कामावरील मजुरांनाही मारहाण केली. एवढेच नाही तर कंत्राटदारासाठी धमकीचे पत्रक टाकले.

ठळक मुद्देपंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उठविला आवाज : जाळपोळीचा निषेध करण्यासाठी दाखविली एकजूट

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोलीस उपविभागाच्या हद्दीतील किष्टापूर नाल्यावरच्या बहुप्रतीक्षित पुलाच्या बांधकामावर असणाऱ्या वाहनांची मंगळवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. या घटनेचा परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी एकत्रित जमून तीव्र निषेध व्यक्त केला. नक्षलवाद्यांनी अशा कामात कितीही अडथळे आणले तरी त्याला न जुमानता या लोकोपयोगी पुलाचे काम पुन्हा सुरू करा, अशी एकमुखी मागणी त्यांनी केली.देचलीपेठा पंचक्रोशीतील १६ गावातील नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीनुसार किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मंगळवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून उपयोगात आणले जाणारे ट्रॅक्टर, मिक्सर व इतर साहित्य जाळून कामावरील मजुरांनाही मारहाण केली. एवढेच नाही तर कंत्राटदारासाठी धमकीचे पत्रक टाकले. अशा पद्धतीने कामात अडथळा आणून हे काम बंद पाडण्याचा नक्षलवाद्यांचा उद्देश असला तरी तो यशस्वी होऊ द्यायचा नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. किष्टापूर नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्याचे ४ ते ५ महिने १६ गावातील नागरिकांचा संपर्क तुटून मोठे हाल होतात. आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागतात. ज्या घरातील लोकांना हे दु:ख सहन करावे लागले त्यांनाच या पुलाचे महत्व माहीत आहे. निष्पाप आदिवासी नागरिकांचा खून करणाºया नक्षलवाद्यांना हे कळणार नाही. त्यांना आदिवासी नागरिकांच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.पोलीस विभागाच्या जनजागृतीने नागरिक पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.‘कोरोना’च्या नियंत्रणानंतर बांधकामांना सुरूवातजिल्ह्यात कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे बंद असून सर्व कंत्राटदारांना कामावरील वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून यापूर्वीच निर्देश दिले आहेत. ही साथ आटोक्यात आल्यानंतर पुन्हा रस्ते व इतर बांधकामे सुरू केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या संचारबंदीमुळे दुर्गम भागातील बरीच विकास कामे थांबली आहेत.मुर्दाबादच्या घोषणा देत पुतळ्याचे दहनयावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी विविध फलक हाती घेऊन ‘नक्षलवाद मुर्दाबाद, नक्षलवाद्यांना नको विकास - जाळपोळ करून गावं केली भकास’ अशा घोषणा दिल्या. तसेच किष्टापूर नाला झालाच पाहीजे, असा निर्धार व्यक्त करून नक्षलवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या या हिमतीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक करत कोरोनाच्या साथीनंतर पुन्हा हे पुलाचे बांधकाम सुरू केले जाईल, असे आश्वासनही त्यांना दिले. अहेरी तालुक्यात नक्षलवादी विघातक कृत्य करीत असले तरी ग्रामीण व दुर्गम भागातील लोक नक्षल्यांना जुमानत नाही, हे दाखवून दिले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक