शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस उंचावणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने बामणी पोलीस स्टेशनच्या परिसरात १५ हजार पपई रोपांची रोपवाटिका तयार करण्यात आली. दि.२२ ला बामणी येथे पपई लागवड प्रशिक्षण व रोपे वाटप मेळावा पार पाडण्यात आला. सुरुवातीला पोलीस अधीक्षक गोयल यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक मदन मस्के (प्रभारी अधिकारी, बामणी) यांनी लिहिलेल्या पपई लागवड पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कबामणी : आदिवासीबहुल जिल्ह्यातील नागरिकांना परंपरागत धान लागवडीसोबत फळबाग लागवडीचा नवीन मार्ग दाखवत त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जात आहे. पोलिसांच्या दादालोरा खिडकीच्या कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना पपईसह इतर फळझाडांची १५ हजार रोपे पोलिसांनी वाटप केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.शेतकऱ्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने बामणी पोलीस स्टेशनच्या परिसरात १५ हजार पपई रोपांची रोपवाटिका तयार करण्यात आली. दि.२२ ला बामणी येथे पपई लागवड प्रशिक्षण व रोपे वाटप मेळावा पार पाडण्यात आला.सुरुवातीला पोलीस अधीक्षक गोयल यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक मदन मस्के (प्रभारी अधिकारी, बामणी) यांनी लिहिलेल्या पपई लागवड पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडीअडचणी समजून घेऊन कृषी विभागाच्या विविध योजना व कृषी तंत्रज्ञान तसेच पपई लागवडीबाबत तालुका कृषी अधिकारी सिरोंचा मदन मेश्राम पं.स. सिरोंचाचे कृषी अधिकारी एस.डी.  कोपनार  यांनी  मार्गदर्शन  केले.यावेळी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० पपई रोपे, गांडूळ खत व पपई लागवडीबाबतच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. १० महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस किटचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा राहुल गायकवाड, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, प्रगतिशील शेतकरी रवी कारसपल्ली, उपपोस्टे ब्रामणीचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच अहेरी, जिमलगट्टा उपविभागातील २०० ते २५० शेतकरी उपस्थित होते. पाेलिसांच्या या उपक्रमाचे त्यांनी काैतूक केले.कार्यक्रमासाठी उपपोस्टे बामणीचे प्रभारी अधिकारी सपोनि मदन मस्के, पो.उपनिरीक्षक दीपक पारधे, संभाजी मुंडे, उदय पाटील व अंमलदार आदींनी सहकार्य केले.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी  विविध ठाण्यांचा पुढाकार- शेती हे केवळ उपजीविकेचे साधन न राहता आर्थिक उत्पन्नवाढीचा स्रोत बनावी यासाठी शेतकरी बांधवांना नवीन पीक पद्धतीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, तसेच रोपे वाटप करून कृषीविषयक जागृती आणण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. यापूर्वी कृषी समृद्धी योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर पेरमिली पो.स्टे.मार्फत जिल्हाभरातील होतकरू व गरजू शेतकऱ्यांना १५ हजार शेवगा रोपे वाटप करण्यात आली होती. राजाराम (खां.) पोलिसांच्या वतीने १५ हजार सीताफळ रोपांची रोप वाटिका तयार केली असून ती रोपेही शेतकऱ्यांना लागवडीकरिता वाटप केली जाणार आहेत, असे यावेळी पो. अधीक्षक अंकित गोयल म्हणाले.

 

टॅग्स :Policeपोलिसagricultureशेती