शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी भंडारेश्वराला साकडे

By admin | Updated: August 30, 2014 23:46 IST

जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून मागील २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपीक करपले आहे.

वैरागड : जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून मागील २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपीक करपले आहे. जमिनीला भेगा जाऊन वाळवी लागली आहे. त्यामुळे वैरागड येथील शेतकऱ्यांनी खोब्रागडी नदीच्या काठावर असलेल्या पुरातन भंडारेश्वर मंदिरात शिवलिंगावर जलाभिषेक करून पावसासाठी देवाला साकडे घातले. यावेळी बहुसंख्य शेतकरी भाविक उपस्थित होते. अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरीप हंगामात कोरडा दुष्काळ सदृष्य परिस्थिती जिल्ह्यातील अनेक भागासह वैरागड परिसरात निर्माण झाली आहे. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात आहेत. त्यामुळे वैरागड येथे गावाजवळून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवरील भंडारेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. यावेळी अनेक शेतकरी पुरूष, स्त्रिया व युवक उपस्थित होते. यावेळी भंडारेश्वरातील शिवलिंगावर नदीतून आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक करण्यात आला. मंदिरातील गाभारा पूर्णपणे पाण्याने भरण्यात आला. यावेळी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, सरपंच सेवानंद सहारे यांच्या उपस्थितीत शिवलिंगाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर जलाभिषेक करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत पंच कमेटी, श्रीक्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समिती, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, हनुमान/महादेव मंदिर देवस्थान समितीने पुढाकार घेतला होता. गावातील नागरिकांनी घागरी, कळसे, बादलीच्या माध्यमातून नदी पात्रातील पाणी आणून भंडारेश्वरातील शिवलिंगावर जलाभिषेक केला. त्यानंतर पाच पांडव देवस्थान, आदी शक्ती माता मंदिरात पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी बहुसंख्येने पूजाअर्चेत सभाग दर्शविला होता. त्यामुळे धार्मिक उत्सवाचे वातावरण मंदिर परिसरात निर्माण झाले होते. वैरागड परिसरात अनेक शेतकऱ्यांचे पीक करपल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे मागील २० ते २५ दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मागील दोन दिवसापूर्वी या परिसरात तुरळक स्वरूपातच पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकाला फारसा फायदा झाला नाही. वैरागड परिसरातील शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.(वार्ताहर)