शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एस.टी. ने प्रवास करताय..? मग छत्री नक्की साेबत न्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2023 22:14 IST

Gadchiroli News अहेरी उपविभागातील नागरिकांकरिता प्रवासासाठी एकमेव साधन एसटी महामंडळाची बस आहे. मात्र, या बसेसची अवस्था अतिशय बिकट असून बसेसचे छत गळत असल्याने प्रवाशांना बसेसमध्ये छत्री घेऊस बसावे लागत आहे.

गडचिरोलीः अहेरी उपविभागातील नागरिकांकरिता प्रवासासाठी एकमेव साधन एसटी महामंडळाची बस आहे. मात्र, या बसेसची अवस्था अतिशय बिकट असून बसेसचे छत गळत असल्याने प्रवाशांना बसेसमध्ये छत्री घेऊस बसावे लागत आहे. या स्थितीचा प्रत्यय अहेरी-सिराेंचा मार्गाने जाणाऱ्या एका बसमध्ये आला.

अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी येथील प्रवाशांना खड्डेमय रस्त्यांनीच प्रवास करावा लागत आहे. पाचही तालुक्यांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बसेससुद्धा भंगार झाल्या आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेक उपक्रम व कार्यक्रम साजरे होत आहेत. मात्र, अहेरी उपविभागातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. अनेक ठिकाणी पक्के रस्ते, वीज, राहण्याची पक्की सोय म्हणून घर, शिक्षण आणि आरोग्य या समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर चांगल्या बसेस साेडणे गरजेचे आहे. तरीही चांगल्या बसेस पाठविण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.

अहेरी बसस्थानकातून सिरोंचा येथे मला जायचे हाेते. त्या बसमध्ये मी बसले. काही वेळेतच पाऊस सुरू झाला. आमच्या अंगावर पाणी पडत होते. त्यामुळे बसमधे छत्री उघडावी लागली. परंतु ज्यांच्याजवळ छत्री नव्हती ते प्रवासी पावसाच्या पाण्यामुळे भिजले.

- प्रवासी

 

अहेरी उपविभागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. छोटी दुरुस्ती आगार पातळीवर करण्यात येत आहे. मोठ्या दुरुस्तीसाठी त्या बसेसची विभागीय कार्यशाळेतच दुरुस्ती करणे आवश्यक आहे. खड्ड्यांमुळे बसेसची बॉडी खिळखिळी होत आहे. त्यामुळे अहेरी आगाराला नवीन २५ बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी महामंडळाकडे केली आहे.

- चंद्रभूषण घागरगुंडे, आगार व्यवस्थापक अहेरी

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक