शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांविना ‘एसटी’ पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

४ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. त्यामुळे मोजक्या प्रवाशांची अट टाकून एसटीला जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या चालविण्याची परवानगी मिळाली. २२ मार्चपासून बंद असलेल्या एसटी बसला लॉकडाऊनमधून सूट दिल्यानंतर प्रवाशी मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार एसटीच्या स्थानिक व्यवस्थापनाने काही बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने वाहक व चालकाचा खर्चही भरून निघणे कठीण झाल्याने काही बसफेऱ्या बंद केल्या.

ठळक मुद्देमहिना उलटला : केवळ मुख्य मार्गावर मोजक्याच फेऱ्या सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या ४ मे पासून जिल्ह्यांतर्गत प्रवाशी वाहतूक करण्यास शासनाने एसटीला परवानगी दिली. याला आता महिनाभराचा कालावधी उलटला. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने बोटावर मोजण्याएवढ्याच बसफेºया चालविल्या जात आहेत. ज्या उन्हाळ्यात एसटी बसेसमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती, त्या बसगाड्या आता प्रवाशांवाचून पोरक्या झाल्या आहेत.४ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. त्यामुळे मोजक्या प्रवाशांची अट टाकून एसटीला जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या चालविण्याची परवानगी मिळाली. २२ मार्चपासून बंद असलेल्या एसटी बसला लॉकडाऊनमधून सूट दिल्यानंतर प्रवाशी मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार एसटीच्या स्थानिक व्यवस्थापनाने काही बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने वाहक व चालकाचा खर्चही भरून निघणे कठीण झाल्याने काही बसफेऱ्या बंद केल्या.मुख्य मार्गावर काही बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र त्यांनाही प्रवाशी मिळत नसल्याने एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. गुरूवारी गडचिरोली आगारातून अहेरीसाठी चार, आसरअलीसाठी दोन, देसाईगंज चार, कुरखेडा दोन व देसाईगंज ते कुरखेडा दोन अशा १४ फेऱ्या चालविण्यात आल्या. त्यातून केवळ ४० टक्के भारमान आले आहे.दुचाकींचा वापर वाढलाबसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्केच प्रवाशी बसवायचे आहेत. एका आसनावर एकच प्रवाशी बसणार आहे. मात्र बसमध्ये गर्दी होईल. त्यामुळे आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ही भिती नागरिकांमध्ये असल्याने नागरिक बसचा प्रवास टाळत आहेत. बसऐवजी स्वत:च्या दुचाकी वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. दोन जिल्ह्याच्या सीमा अजुनही बंद आहेत. त्यामुळे लांबचा प्रवास करण्याची गरज नागरिकांना पडत नाही. जिल्ह्यांतर्गतचा प्रवास स्वत:च्या दुचाकी वाहनाने करीत आहेत. आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. शेतीची कामे सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे फिरणे बंद होणार आहे. परिणामी एसटीला प्रवाशी मिळणे पुन्हा कठीण होणार आहे.