शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

प्रवाशांविना ‘एसटी’ पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

४ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. त्यामुळे मोजक्या प्रवाशांची अट टाकून एसटीला जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या चालविण्याची परवानगी मिळाली. २२ मार्चपासून बंद असलेल्या एसटी बसला लॉकडाऊनमधून सूट दिल्यानंतर प्रवाशी मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार एसटीच्या स्थानिक व्यवस्थापनाने काही बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने वाहक व चालकाचा खर्चही भरून निघणे कठीण झाल्याने काही बसफेऱ्या बंद केल्या.

ठळक मुद्देमहिना उलटला : केवळ मुख्य मार्गावर मोजक्याच फेऱ्या सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या ४ मे पासून जिल्ह्यांतर्गत प्रवाशी वाहतूक करण्यास शासनाने एसटीला परवानगी दिली. याला आता महिनाभराचा कालावधी उलटला. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने बोटावर मोजण्याएवढ्याच बसफेºया चालविल्या जात आहेत. ज्या उन्हाळ्यात एसटी बसेसमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती, त्या बसगाड्या आता प्रवाशांवाचून पोरक्या झाल्या आहेत.४ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. त्यामुळे मोजक्या प्रवाशांची अट टाकून एसटीला जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या चालविण्याची परवानगी मिळाली. २२ मार्चपासून बंद असलेल्या एसटी बसला लॉकडाऊनमधून सूट दिल्यानंतर प्रवाशी मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार एसटीच्या स्थानिक व्यवस्थापनाने काही बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने वाहक व चालकाचा खर्चही भरून निघणे कठीण झाल्याने काही बसफेऱ्या बंद केल्या.मुख्य मार्गावर काही बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र त्यांनाही प्रवाशी मिळत नसल्याने एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. गुरूवारी गडचिरोली आगारातून अहेरीसाठी चार, आसरअलीसाठी दोन, देसाईगंज चार, कुरखेडा दोन व देसाईगंज ते कुरखेडा दोन अशा १४ फेऱ्या चालविण्यात आल्या. त्यातून केवळ ४० टक्के भारमान आले आहे.दुचाकींचा वापर वाढलाबसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्केच प्रवाशी बसवायचे आहेत. एका आसनावर एकच प्रवाशी बसणार आहे. मात्र बसमध्ये गर्दी होईल. त्यामुळे आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ही भिती नागरिकांमध्ये असल्याने नागरिक बसचा प्रवास टाळत आहेत. बसऐवजी स्वत:च्या दुचाकी वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. दोन जिल्ह्याच्या सीमा अजुनही बंद आहेत. त्यामुळे लांबचा प्रवास करण्याची गरज नागरिकांना पडत नाही. जिल्ह्यांतर्गतचा प्रवास स्वत:च्या दुचाकी वाहनाने करीत आहेत. आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. शेतीची कामे सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे फिरणे बंद होणार आहे. परिणामी एसटीला प्रवाशी मिळणे पुन्हा कठीण होणार आहे.