शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

प्रवाशांविना ‘एसटी’ पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

४ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. त्यामुळे मोजक्या प्रवाशांची अट टाकून एसटीला जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या चालविण्याची परवानगी मिळाली. २२ मार्चपासून बंद असलेल्या एसटी बसला लॉकडाऊनमधून सूट दिल्यानंतर प्रवाशी मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार एसटीच्या स्थानिक व्यवस्थापनाने काही बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने वाहक व चालकाचा खर्चही भरून निघणे कठीण झाल्याने काही बसफेऱ्या बंद केल्या.

ठळक मुद्देमहिना उलटला : केवळ मुख्य मार्गावर मोजक्याच फेऱ्या सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या ४ मे पासून जिल्ह्यांतर्गत प्रवाशी वाहतूक करण्यास शासनाने एसटीला परवानगी दिली. याला आता महिनाभराचा कालावधी उलटला. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने बोटावर मोजण्याएवढ्याच बसफेºया चालविल्या जात आहेत. ज्या उन्हाळ्यात एसटी बसेसमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती, त्या बसगाड्या आता प्रवाशांवाचून पोरक्या झाल्या आहेत.४ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. त्यामुळे मोजक्या प्रवाशांची अट टाकून एसटीला जिल्ह्यांतर्गत बसफेऱ्या चालविण्याची परवानगी मिळाली. २२ मार्चपासून बंद असलेल्या एसटी बसला लॉकडाऊनमधून सूट दिल्यानंतर प्रवाशी मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार एसटीच्या स्थानिक व्यवस्थापनाने काही बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने वाहक व चालकाचा खर्चही भरून निघणे कठीण झाल्याने काही बसफेऱ्या बंद केल्या.मुख्य मार्गावर काही बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र त्यांनाही प्रवाशी मिळत नसल्याने एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. गुरूवारी गडचिरोली आगारातून अहेरीसाठी चार, आसरअलीसाठी दोन, देसाईगंज चार, कुरखेडा दोन व देसाईगंज ते कुरखेडा दोन अशा १४ फेऱ्या चालविण्यात आल्या. त्यातून केवळ ४० टक्के भारमान आले आहे.दुचाकींचा वापर वाढलाबसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्केच प्रवाशी बसवायचे आहेत. एका आसनावर एकच प्रवाशी बसणार आहे. मात्र बसमध्ये गर्दी होईल. त्यामुळे आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ही भिती नागरिकांमध्ये असल्याने नागरिक बसचा प्रवास टाळत आहेत. बसऐवजी स्वत:च्या दुचाकी वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. दोन जिल्ह्याच्या सीमा अजुनही बंद आहेत. त्यामुळे लांबचा प्रवास करण्याची गरज नागरिकांना पडत नाही. जिल्ह्यांतर्गतचा प्रवास स्वत:च्या दुचाकी वाहनाने करीत आहेत. आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. शेतीची कामे सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे फिरणे बंद होणार आहे. परिणामी एसटीला प्रवाशी मिळणे पुन्हा कठीण होणार आहे.