शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला ११ कोटी १६ लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: October 5, 2016 02:10 IST

शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता पाच ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना कार्यान्वित केली आहे.

शाळकरी मुलींसाठी अहिल्याबाई होळकर प्रवास योजनागडचिरोली : शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता पाच ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत एप्रिल, जुलै, आॅगस्ट २०१६ या तीन महिन्याच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागाला एकूण ११ कोटी १६ लाख ८ हजार ४०२ रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यातून गडचिरोलीचा एसटी विभाग मालामाल झाला आहे.राहत्या गावापासून पाच किमी अंतरापेक्षा अधिक अंतरावर असलेल्या शाळेच्या गावी ये-जा करून विद्यार्थिनींना शिक्षण घेणे सुलभ व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत अहिल्याबाई होळकर मोफत बससेवेची योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन इयत्ता पाच ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थिनी बाहेरगावातील शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. सदर योजना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविले जात आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य परिवहन महामंडळाचे सहकार्य घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात अहेरी व गडचिरोली आगारामार्फत विद्यार्थिनींना या योजनेंतर्गत मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१६ च्या एप्रिल महिन्यात एकूण ३ हजार ७५ विद्यार्थिनींनी एसटीचा मोफत प्रवास केला. या प्रवासापोटी राज्य शासनाकडून गडचिरोलीच्या एसटी विभागाला २० लाख ६३ हजार ७२० रूपयाचे उत्पन्न मिळाले. सन २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रातील जुलै महिन्यात ६ हजार ८२५ विद्यार्थिनींनी स्वगावापासून शाळेच्या गावापर्यंत मोफत प्रवास केला. यातून गडचिरोली एसटी विभागाला ४४ लाख ९२ हजार २९ रूपयाचे उत्पन्न मिळाले. आॅगस्ट महिन्यात ६ हजार ९३६ लाभार्थी विद्यार्थिनींच्या प्रवासातून ४६ लाख १२ हजार ६५३ रूपयांचे उत्पन्न प्रतिपुर्ती मुल्यातून गडचिरोली एसटी विभागाला मिळाले. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली एसटी विभागाला निळ्या रंगाच्या स्वतंत्र बसेस देण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींसाठीच्या सदर बसफेऱ्या शहरी भागासह ग्रामीण व दुर्गम भागात पोहोचत आहेत. शासनाच्या योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला दरवर्षी कोट्यवधी रूपयाचा नफा मिळत आहे. याशिवाय खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयाच्या सहलीतूनही गडचिरोली आगाराला लाखो रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)शासनाकडे अनुदान प्रलंबित; महामंडळ अडचणीतराज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत शालेय विद्यार्थिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बस सुविधा पुरविली जाते. या सेवेपोटी शासनाला राज्य परिवहन महामंडळाकडे विद्यार्थिनींचे प्रतिपुर्ती मुल्य हे प्रवास खर्च म्हणून अदा करावे लागतात. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे शासनातर्फे सदर प्रवासाचे प्रतिपूर्ती मुल्य अदा केले जाते. मात्र शासनाकडे परिवहन महामंडळाचे लाखो रूपयाचे प्रतिपुर्ती मुल्य शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला प्रसंगी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते.