लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या २२ मार्चच्या जनता कर्फ्यूपासून जिल्ह्यात एसटी बसची चाके थांबली आहेत. लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलपर्यंत आहे. तोपर्यंत एसटी बंद राहणार आहे, हे निश्चित आहे. या २४ दिवसांच्या कालावधीत एकट्या गडचिरोली आगाराला जवळपास २ कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. मात्र या उत्पन्नावर आता पाणी सोडावे लागणार आहे.गडचिरोली आगारात एकूण १११ बसेस आहेत. या बसेसच्या माध्यमातून दरदिवशी जवळपास साडेनऊ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी २२ मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तेव्हापासूनच एसटीची सेवा बंद आहे. १४ एप्रिलपर्यंत केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत एसटी धावणार नाही, हे निश्चित आहे. तोपर्यंत एसटीला मिळू शकणाऱ्या २ कोटी ३० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फेरावे लागले आहे.दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर मूलभूत सुविधांवरील खर्च सुरूच आहे. नियमित उत्पन्न मिळत असतानाही कधीकधी एसटीला कर्मचाºयांचे वेतन देण्यासाठी किंवा डिझेल खरेदी करण्यासाठी पैसे राहत नव्हते. आतातर एसटी २३ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे एसटीची आर्थिक परिस्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे.तीन दिवसांनी सुरू केल्या जातात बसेसबंद स्थितीमुळे बसची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होऊन खराब होण्याचा धोका राहते. तसेच अनेक दिवस वाहन बंद राहिल्यास आॅईल घट्ट होण्याची शक्यता राहते. या घटना टाळण्यासाठी दर तीन दिवसांनी सर्वच बसेस जवळपास १० ते १५ मिनिटे सुरू केल्या जातात. यामुळे डिझेलचाही खर्च एसटीवर होत आहे.
२४ दिवसांत एसटी महामंडळाला अडीच कोटी रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST
गडचिरोली आगारात एकूण १११ बसेस आहेत. या बसेसच्या माध्यमातून दरदिवशी जवळपास साडेनऊ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी २२ मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तेव्हापासूनच एसटीची सेवा बंद आहे. १४ एप्रिलपर्यंत केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत एसटी धावणार नाही, हे निश्चित आहे.
२४ दिवसांत एसटी महामंडळाला अडीच कोटी रुपयांचा फटका
ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : गडचिरोली आगारातील स्थिती