शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्त्यांमुळे एसटी बसचा प्रवास झाला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण आहे. या भागात खासगी प्रवासाची वाहने अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या मार्गावर एसटीची वाहने चालवावीच लागतात. मात्र जिल्ह्यातील काही मार्गांची माेठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. माेठमाेठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्यासुद्धा अधिक आहे. एसटी हे तुलनेने माेठे वाहन आहे. त्यामुळे खड्डा चुकविणे कठीण हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील प्रमुख मार्गांबराेबरच इतरही काही मार्ग अतिशय खराब झाले आहेत. सामाजिक दृष्टिकाेन लक्षात घेऊन या मार्गांवर एसटीच्या फेऱ्या चालवाव्या लागत आहेत. मात्र या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांचे चांगलेच हाल हाेत आहेत. तसेच एसटीचेही नुकसान हाेत आहे.गडचिराेली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण आहे. या भागात खासगी प्रवासाची वाहने अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या मार्गावर एसटीची वाहने चालवावीच लागतात. मात्र जिल्ह्यातील काही मार्गांची माेठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. माेठमाेठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्यासुद्धा अधिक आहे. एसटी हे तुलनेने माेठे वाहन आहे. त्यामुळे खड्डा चुकविणे कठीण हाेते. तरीही नागरिकांची अडचण लक्षात घेऊन एसटी बसेस साेडाव्या लागत आहेत. पावसाळ्यात डांबरी मार्गांची दुरुस्ती करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे पुन्हा तीन महिने अशाच पद्धतीच्या मार्गांवरून वाहने चालविल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 

आलापल्ली-सिराेंचा मार्ग सर्वांत खराबआलापल्ली-सिराेंचा हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घाेषित करण्यात आला आहे. मात्र या मार्गाची मागील दाेन वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही. आता या मार्गावर माेठमाेठे खड्डे पडले आहेत. दाेन तासांचा प्रवास तीन ते चार तास करावा लागत आहे. या मार्गामुळे प्रवासीसुद्धा त्रस्त झाले आहेत. 

मार्ग वळविणे शक्य नाही- गडचिराेली जिल्ह्याचा विस्तार उत्तर-दक्षिण सर्वाधिक आहे, तर पूर्व-पश्चिमेचा विस्तार अतिशय कमी आहे. काेरची ते सिराेंचा हा प्रमुख मार्ग आहे. या एकाच मार्गाने बहुतांश तालुके जाेडण्यात आले आहेत. त्यामुळे एखादा मार्ग खराब असला तर दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविणे शक्य नाही. तसेच गडचिराेली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे.  त्यामुळे या मार्गाचीही दुर्दशा झाली आहे.

एसटीचा खर्च वाढलामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन कमी वेगाने चालवावे लागते. एका खड्ड्यातून एसटी बस दुसऱ्या खड्ड्यात जाते. सततच्या आदळआपटीमुळे एसटीचे टायर लवकरच खराब हाेत आहेत. तसेच खिडक्यांच्या काचा फुटणे, बेअरिंग खराब हाेणे, नटबाेल्ट ढिले हाेणे यांसारखे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे एसटीच्या देखभालीचा खर्च वाढत चालला आहे. कमी वेगाने वाहन चालवावे लागत असल्यामुळे डिझेलचाही खर्च वाढला आहे.

 

टॅग्स :state transportएसटी