शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

भामरागडातील रस्त्यांवर पसरला चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:12 IST

तीन दिवस पुराने वेढलेल्या भामरागड शहरातील पूर शुक्रवारी ओसरला. पुरामुळे भामरागडातील रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांची सुध्दा मोठी हानी झाली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । तीन दिवसानंतर पूर ओसरला; पुरात सापडलेल्या घरांची झाली पडझड; साहित्याचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तीन दिवस पुराने वेढलेल्या भामरागड शहरातील पूर शुक्रवारी ओसरला. पुरामुळे भामरागडातील रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांची सुध्दा मोठी हानी झाली आहे.मागील १५ दिवसांत भामरागड शहरात तब्बल तीन वेळा पर्लकोटा नदीचे पाणी शिरून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. छत्तीसगड राज्यातील धरणाचे पाणी इंद्रावती नदीला सोडल्याने पर्लकोटा नदीला दाब निर्माण होऊन मंगळवारी रात्री तिसऱ्यांदा भामरागडात पाण शिरले. शुक्रवारी सकाळी पूर ओसरला. पुरामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे चिखल निर्माण झाले आहे. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यांच्याही घरात गाळ साचला आहे. सतत तीन दिवस पाणी साचून राहिल्याने साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरताच नागरिकांनी आपापले घर गाठून सामान काढण्यास सुरूवात केली आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मोलमजुरी करणाºया नागरिकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेती सोडून सुरू आहे घराची डागडुजीपुरामुळे सामान्य नागरिक, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. ही कामे सोडून घराची डागडुजी करण्यात नागरिक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. पूराच्या पाण्यात साहित्य सापडल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावे, अशी मागणी होत आहे. भामरागड शहर पर्लकोटा नदीच्या अगदी काठावर वसले आहे. इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर पर्लकोटाला दाब निर्माण होते. त्यामुळे पर्लकोटाचे पाणी भामरागड शहरात शिरते. त्यामुळे नुकसान होते.

टॅग्स :Rainपाऊस