शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

भामरागडातील रस्त्यांवर पसरला चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:12 IST

तीन दिवस पुराने वेढलेल्या भामरागड शहरातील पूर शुक्रवारी ओसरला. पुरामुळे भामरागडातील रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांची सुध्दा मोठी हानी झाली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । तीन दिवसानंतर पूर ओसरला; पुरात सापडलेल्या घरांची झाली पडझड; साहित्याचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तीन दिवस पुराने वेढलेल्या भामरागड शहरातील पूर शुक्रवारी ओसरला. पुरामुळे भामरागडातील रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांची सुध्दा मोठी हानी झाली आहे.मागील १५ दिवसांत भामरागड शहरात तब्बल तीन वेळा पर्लकोटा नदीचे पाणी शिरून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. छत्तीसगड राज्यातील धरणाचे पाणी इंद्रावती नदीला सोडल्याने पर्लकोटा नदीला दाब निर्माण होऊन मंगळवारी रात्री तिसऱ्यांदा भामरागडात पाण शिरले. शुक्रवारी सकाळी पूर ओसरला. पुरामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे चिखल निर्माण झाले आहे. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यांच्याही घरात गाळ साचला आहे. सतत तीन दिवस पाणी साचून राहिल्याने साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरताच नागरिकांनी आपापले घर गाठून सामान काढण्यास सुरूवात केली आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मोलमजुरी करणाºया नागरिकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेती सोडून सुरू आहे घराची डागडुजीपुरामुळे सामान्य नागरिक, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. ही कामे सोडून घराची डागडुजी करण्यात नागरिक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. पूराच्या पाण्यात साहित्य सापडल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावे, अशी मागणी होत आहे. भामरागड शहर पर्लकोटा नदीच्या अगदी काठावर वसले आहे. इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर पर्लकोटाला दाब निर्माण होते. त्यामुळे पर्लकोटाचे पाणी भामरागड शहरात शिरते. त्यामुळे नुकसान होते.

टॅग्स :Rainपाऊस