शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडातील रस्त्यांवर पसरला चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:12 IST

तीन दिवस पुराने वेढलेल्या भामरागड शहरातील पूर शुक्रवारी ओसरला. पुरामुळे भामरागडातील रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांची सुध्दा मोठी हानी झाली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । तीन दिवसानंतर पूर ओसरला; पुरात सापडलेल्या घरांची झाली पडझड; साहित्याचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तीन दिवस पुराने वेढलेल्या भामरागड शहरातील पूर शुक्रवारी ओसरला. पुरामुळे भामरागडातील रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, त्यांची सुध्दा मोठी हानी झाली आहे.मागील १५ दिवसांत भामरागड शहरात तब्बल तीन वेळा पर्लकोटा नदीचे पाणी शिरून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. छत्तीसगड राज्यातील धरणाचे पाणी इंद्रावती नदीला सोडल्याने पर्लकोटा नदीला दाब निर्माण होऊन मंगळवारी रात्री तिसऱ्यांदा भामरागडात पाण शिरले. शुक्रवारी सकाळी पूर ओसरला. पुरामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे चिखल निर्माण झाले आहे. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यांच्याही घरात गाळ साचला आहे. सतत तीन दिवस पाणी साचून राहिल्याने साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरताच नागरिकांनी आपापले घर गाठून सामान काढण्यास सुरूवात केली आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मोलमजुरी करणाºया नागरिकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेती सोडून सुरू आहे घराची डागडुजीपुरामुळे सामान्य नागरिक, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. ही कामे सोडून घराची डागडुजी करण्यात नागरिक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. पूराच्या पाण्यात साहित्य सापडल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावे, अशी मागणी होत आहे. भामरागड शहर पर्लकोटा नदीच्या अगदी काठावर वसले आहे. इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर पर्लकोटाला दाब निर्माण होते. त्यामुळे पर्लकोटाचे पाणी भामरागड शहरात शिरते. त्यामुळे नुकसान होते.

टॅग्स :Rainपाऊस