शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पुस्तके छापण्याच्या हालचालींना वेग

By admin | Updated: June 21, 2014 01:39 IST

बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे.

गडचिरोली : बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे. या पुस्तका छापण्यासाठी निविदा काढण्यात आली असून पहिल्यांदाच यावर्षी २६ जून किंवा १ जुलैपर्यंत पुस्तके मिळणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा, चामोर्शी या दोन तालुक्यांमध्ये बंगाली समाजाच्या नागरिकांची संख्या बऱ्यापैकी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण मिळावे, असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार बंगाली समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बंगाली माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मिळून सुमारे ४६ बंगाली माध्यमाच्या प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ५ हजार ८२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ ते ८ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचा मोफत पुरवठा करण्यात येतो. मात्र बंगाली माध्यमाच्या शाळा केवळ गडचिरोली जिल्ह्यातच असल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या मार्फतीने निविदा मागावून पाठ्यपुस्तके छापली जातात. मात्र यासाठी दरवर्षीच उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना नेहमी दिवाळीनंतरच नवीन पुस्तके हाती पडत असल्याचा अनुभव आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना जुन्या फाटलेल्या पुस्तकातूनच अध्ययन करावे लागते. बऱ्याचवेळा केवळ शिक्षकाकडे एक पुस्तक राहते व विद्यार्थ्यांना मात्र पुस्तकाअभावीच अध्ययन करावे लागत असल्याचा आजपर्यंतचा कटू अनुभव बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आहे. एखाद्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर सदर अभ्यासक्रम बंगाली माध्यमामध्ये भाषांतरीत करावा लागतो. ही पुस्तके तर छापण्याला अक्षम्य उशीर होत असल्याचाही आजपर्यंत दिसून आले आहे. यावर्षी पहिल्यांदाच शिक्षण विभागाने बंगाली विद्यार्थ्यांच्या हातामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तके हातामध्ये पडाव्या यासाठी मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच नियोजन केले आहे. तिसऱ्या व चौथ्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलला असल्याने या अभ्यासक्रमांचे भाषांतराचे काम पूर्ण झाले आहे. पुस्तक छापण्यासाठी जवळपास अडीच ते तीन लाख रूपयाचा खर्च येणार असल्याने हे सर्व काम ई-निविदा काढून करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने ई-निविदा मागितल्या असून कंत्राटदारांना वर्क आॅर्डर देऊन २६ जून पूर्वीच पुस्तके छापून घेण्यात येतील. थोडाफार उशीर झाला तरीही १ जुलैपूर्वी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.