शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तके छापण्याच्या हालचालींना वेग

By admin | Updated: June 21, 2014 01:39 IST

बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे.

गडचिरोली : बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे. या पुस्तका छापण्यासाठी निविदा काढण्यात आली असून पहिल्यांदाच यावर्षी २६ जून किंवा १ जुलैपर्यंत पुस्तके मिळणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा, चामोर्शी या दोन तालुक्यांमध्ये बंगाली समाजाच्या नागरिकांची संख्या बऱ्यापैकी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण मिळावे, असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार बंगाली समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बंगाली माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मिळून सुमारे ४६ बंगाली माध्यमाच्या प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ५ हजार ८२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ ते ८ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचा मोफत पुरवठा करण्यात येतो. मात्र बंगाली माध्यमाच्या शाळा केवळ गडचिरोली जिल्ह्यातच असल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या मार्फतीने निविदा मागावून पाठ्यपुस्तके छापली जातात. मात्र यासाठी दरवर्षीच उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना नेहमी दिवाळीनंतरच नवीन पुस्तके हाती पडत असल्याचा अनुभव आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना जुन्या फाटलेल्या पुस्तकातूनच अध्ययन करावे लागते. बऱ्याचवेळा केवळ शिक्षकाकडे एक पुस्तक राहते व विद्यार्थ्यांना मात्र पुस्तकाअभावीच अध्ययन करावे लागत असल्याचा आजपर्यंतचा कटू अनुभव बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आहे. एखाद्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर सदर अभ्यासक्रम बंगाली माध्यमामध्ये भाषांतरीत करावा लागतो. ही पुस्तके तर छापण्याला अक्षम्य उशीर होत असल्याचाही आजपर्यंत दिसून आले आहे. यावर्षी पहिल्यांदाच शिक्षण विभागाने बंगाली विद्यार्थ्यांच्या हातामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तके हातामध्ये पडाव्या यासाठी मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच नियोजन केले आहे. तिसऱ्या व चौथ्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलला असल्याने या अभ्यासक्रमांचे भाषांतराचे काम पूर्ण झाले आहे. पुस्तक छापण्यासाठी जवळपास अडीच ते तीन लाख रूपयाचा खर्च येणार असल्याने हे सर्व काम ई-निविदा काढून करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने ई-निविदा मागितल्या असून कंत्राटदारांना वर्क आॅर्डर देऊन २६ जून पूर्वीच पुस्तके छापून घेण्यात येतील. थोडाफार उशीर झाला तरीही १ जुलैपूर्वी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.