शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाणे व पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शाह यांनी दिले संकेत
2
नालेसफाई की महापालिकेच्या तिजोरीची सफाई? पालिका अधिकारी घरी, त्यांचे मोबाइल स्पॉटवर
3
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
4
मेट्राे स्थानक २ दिवसांत सुरू करणार; ‘एमएमआरसी’च्या अश्विनी भिडे यांची माहिती
5
महामुंबईतील वाहने बीजिंग, शांघाय, टोकियोपेक्षा जास्त; पार्किंग असेल, तरच वाहन खरेदीस मुभा
6
पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)
7
मुंबईचे मारेकरी; काळजी घ्यावी वाटत नाही हेच शहराचे मोठं दुर्दैव
8
अ‘जून’ भरपूर... पुढील जून महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा
9
विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवायचे आहे का? वादग्रस्त पोस्टप्रकरणी हायकोर्टाकडून जामीन
10
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
11
LSG vs RCB : दिग्वेश राठीचा हिशोब चुकला! जितेश शर्मानं असा घेतला बदला (VIDEO)
12
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
13
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
14
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
15
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
16
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
17
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
18
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
19
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
20
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज

सोयाबीनला फुटले अंकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून काही शेतामध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनला अंकूर फुटले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकासोबतच कपाशी व सोयाबिन पिके घेतली जातात. अनेक शेतकरी सोयाबिन पिकाची लागवड करतात.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा परिणाम : पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी/गडचिरोली : ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत खरीप हंगामातील कपाशी व सोयाबिन ही पिके हातात येण्यासाठी अत्यल्प काळ शिल्लक असताना अवकाळी पावसाने कहर केला. चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून काही शेतामध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनला अंकूर फुटले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकासोबतच कपाशी व सोयाबिन पिके घेतली जातात. अनेक शेतकरी सोयाबिन पिकाची लागवड करतात. चामोर्शी तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबिन पिकाची पेरणी केली होती. सोयाबिन पीक कापणी योग्य तयार झाले आहे. मात्र अवकाळी पावसामुळे सोयाबिनच्या शेंगांमधून कोंब बाहेर येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. असे असतानासुद्धा प्रशासनाच्या वतीने अद्यापही सर्वेक्षण व पंचनाम्याची कार्यवाही हाती घेण्यात न आल्याने चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर, मुधोली रिठ, विठ्ठलपूर, गणपूर रै., जैैरामपूर, किष्टापूर, दुर्गापूर, कोनसरी, सोमनपल्ली, धर्मपूर, वायगाव, प्रियदर्शनी, रेश्मीपूर, राजगोपालपूर आदी गावातील शेतकऱ्याच्या सोयाबिन पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी उपसरपंच नीलकंठ निखाडे यांच्यासह चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यानी केली आहे. विठ्ठलपूर परिसरातील शेतकऱ्याना दरवर्षी संकटाचा सामना करावा लागतो.तुरीसह भाजीपाला पिकालाही फटकाचामोर्शी तालुक्यात तूर व भाजीपाला पिकाचेही क्षेत्र मोठे आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी होत असल्याने खरीप हंगामातील खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे. तुरीचे झाड वाकले असून भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भावही होत आहे.

टॅग्स :agricultureशेती