शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

सोयाबीनला फुटले अंकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून काही शेतामध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनला अंकूर फुटले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकासोबतच कपाशी व सोयाबिन पिके घेतली जातात. अनेक शेतकरी सोयाबिन पिकाची लागवड करतात.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा परिणाम : पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी/गडचिरोली : ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत खरीप हंगामातील कपाशी व सोयाबिन ही पिके हातात येण्यासाठी अत्यल्प काळ शिल्लक असताना अवकाळी पावसाने कहर केला. चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून काही शेतामध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनला अंकूर फुटले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकासोबतच कपाशी व सोयाबिन पिके घेतली जातात. अनेक शेतकरी सोयाबिन पिकाची लागवड करतात. चामोर्शी तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबिन पिकाची पेरणी केली होती. सोयाबिन पीक कापणी योग्य तयार झाले आहे. मात्र अवकाळी पावसामुळे सोयाबिनच्या शेंगांमधून कोंब बाहेर येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. असे असतानासुद्धा प्रशासनाच्या वतीने अद्यापही सर्वेक्षण व पंचनाम्याची कार्यवाही हाती घेण्यात न आल्याने चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर, मुधोली रिठ, विठ्ठलपूर, गणपूर रै., जैैरामपूर, किष्टापूर, दुर्गापूर, कोनसरी, सोमनपल्ली, धर्मपूर, वायगाव, प्रियदर्शनी, रेश्मीपूर, राजगोपालपूर आदी गावातील शेतकऱ्याच्या सोयाबिन पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी उपसरपंच नीलकंठ निखाडे यांच्यासह चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यानी केली आहे. विठ्ठलपूर परिसरातील शेतकऱ्याना दरवर्षी संकटाचा सामना करावा लागतो.तुरीसह भाजीपाला पिकालाही फटकाचामोर्शी तालुक्यात तूर व भाजीपाला पिकाचेही क्षेत्र मोठे आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी होत असल्याने खरीप हंगामातील खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे. तुरीचे झाड वाकले असून भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भावही होत आहे.

टॅग्स :agricultureशेती