शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
2
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
3
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
4
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
5
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
6
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
7
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
8
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
9
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
10
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
11
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
12
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
13
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
14
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
15
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
16
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
17
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
18
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
19
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
20
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटणार

By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST

उशीरा झालेली पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव व पावसाने दिलेला दगा यामुळे सोयाबीन पिकाचे पाहिजे त्या प्रमाणात पोषण झाले नाही. परिणामी सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत.

गडचिरोली : उशीरा झालेली पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव व पावसाने दिलेला दगा यामुळे सोयाबीन पिकाचे पाहिजे त्या प्रमाणात पोषण झाले नाही. परिणामी सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. त्याचबरोबर दाण्यांचा आकारही अत्यंत लहान असल्याने सोयाबीन उत्पादनात यावर्षी कमालीची घट होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतित आहे. १० वर्षापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाची अजिबात ओळख नव्हती. मात्र लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात या पिकाचे प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. त्याचबरोबर कोरडवाहू व हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेता येत असल्याने आजपर्यंत ज्या जमिनी सिंचनाची सुविधा नसल्याने पडीत होत्या. त्या जमिनीमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतल्या जाऊ लागले. यावर्षी जिल्ह्यात ३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. अगदी सुरूवातीलाच महिनाभर पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबिनची पेरणी महिनाभराने उशीरा झाली. त्यानंतरही पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीनचे पीक करपायला लागले होते. पाण्याअभावी पीक कमजोर झाले व दमट वातावरण यामुळे प्रचंड प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झाल्याने झाडांना अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. काही झाडांना तर एकही शेंग लागली नाही. दाणेसुद्धा पूर्णपणे परिपक्व झाले नसल्याने त्यांचा आकार अत्यंत लहान आहे. त्यामुळे एकरी एक ते दोन क्विंटल एवढेच उत्पादन होण्याची शक्यता आहे. एवढ्या उत्पादनात लागवडीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. मागील वर्षीही कापणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते.