शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटणार

By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST

उशीरा झालेली पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव व पावसाने दिलेला दगा यामुळे सोयाबीन पिकाचे पाहिजे त्या प्रमाणात पोषण झाले नाही. परिणामी सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत.

गडचिरोली : उशीरा झालेली पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव व पावसाने दिलेला दगा यामुळे सोयाबीन पिकाचे पाहिजे त्या प्रमाणात पोषण झाले नाही. परिणामी सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. त्याचबरोबर दाण्यांचा आकारही अत्यंत लहान असल्याने सोयाबीन उत्पादनात यावर्षी कमालीची घट होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतित आहे. १० वर्षापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाची अजिबात ओळख नव्हती. मात्र लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात या पिकाचे प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. त्याचबरोबर कोरडवाहू व हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेता येत असल्याने आजपर्यंत ज्या जमिनी सिंचनाची सुविधा नसल्याने पडीत होत्या. त्या जमिनीमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतल्या जाऊ लागले. यावर्षी जिल्ह्यात ३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. अगदी सुरूवातीलाच महिनाभर पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबिनची पेरणी महिनाभराने उशीरा झाली. त्यानंतरही पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीनचे पीक करपायला लागले होते. पाण्याअभावी पीक कमजोर झाले व दमट वातावरण यामुळे प्रचंड प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झाल्याने झाडांना अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. काही झाडांना तर एकही शेंग लागली नाही. दाणेसुद्धा पूर्णपणे परिपक्व झाले नसल्याने त्यांचा आकार अत्यंत लहान आहे. त्यामुळे एकरी एक ते दोन क्विंटल एवढेच उत्पादन होण्याची शक्यता आहे. एवढ्या उत्पादनात लागवडीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. मागील वर्षीही कापणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते.