शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

एक टक्का क्षेत्रावरच पेरणी

By admin | Updated: July 1, 2014 23:28 IST

जुलै महिन्याला सुरूवात होऊनही उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन तापत असल्याने पेरणीचे कामे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हामुळे पेरलेली बियाणेही धोक्यात आली आहेत.

शेतकरी संकटात : पेरलेले बियाणेही धोक्यातगडचिरोली : जुलै महिन्याला सुरूवात होऊनही उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन तापत असल्याने पेरणीचे कामे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हामुळे पेरलेली बियाणेही धोक्यात आली आहेत. कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामात १ लाख ६६ हजार ८० हेक्टरवर पिकांची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. यासाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध व्हावे, यासाठी उन्हाळ्यातच नियोजन करून प्रत्येक शेतकऱ्याला पुरेसे बियाणे व खते उपलब्ध करून दिले. मात्र पावसाच्या आगमनास उशीर झाला आहे. पावसाने कायमची दडी मारल्याने बियाण्यांची पेरणी करण्यास शेतकरी वर्ग तयार नाही. जिल्ह्यात एकूण १ लाख ४९ हजार २६० हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी ५४ हजार ४६० हेक्टरवर आवत्या व ९४ हजार ८०० हेक्टरवर धानाची रोवणी करण्यात येणार आहे. रोवणीसाठी पऱ्हे आवश्यक आहेत. केवळ २ हजार ६८७ हेक्टरवर पऱ्हे टाकण्यात आले आहेत. तर १ हजार ४०४ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. ६ हजार ३२० हेक्टरवर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. १ हजार २८० हेक्टरपैकी ४६ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. तुरीच्या ४ हजार २६० हेक्टरपैकी ४५५, तिळाच्या ७०० हेक्टरपैकी ८ हेक्टरवर बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे. पेरणीला उशीर झाल्यानंतर उत्पादनात घट होते. हा शेतकऱ्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन कमीच होईल. या चिंतेने शेतकरी वर्ग ग्रासला आहे. कर्जाचे डोंगर कसे फेडावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)