शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

एक टक्का क्षेत्रावरच पेरणी

By admin | Updated: July 1, 2014 23:28 IST

जुलै महिन्याला सुरूवात होऊनही उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन तापत असल्याने पेरणीचे कामे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हामुळे पेरलेली बियाणेही धोक्यात आली आहेत.

शेतकरी संकटात : पेरलेले बियाणेही धोक्यातगडचिरोली : जुलै महिन्याला सुरूवात होऊनही उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन तापत असल्याने पेरणीचे कामे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हामुळे पेरलेली बियाणेही धोक्यात आली आहेत. कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामात १ लाख ६६ हजार ८० हेक्टरवर पिकांची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. यासाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध व्हावे, यासाठी उन्हाळ्यातच नियोजन करून प्रत्येक शेतकऱ्याला पुरेसे बियाणे व खते उपलब्ध करून दिले. मात्र पावसाच्या आगमनास उशीर झाला आहे. पावसाने कायमची दडी मारल्याने बियाण्यांची पेरणी करण्यास शेतकरी वर्ग तयार नाही. जिल्ह्यात एकूण १ लाख ४९ हजार २६० हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी ५४ हजार ४६० हेक्टरवर आवत्या व ९४ हजार ८०० हेक्टरवर धानाची रोवणी करण्यात येणार आहे. रोवणीसाठी पऱ्हे आवश्यक आहेत. केवळ २ हजार ६८७ हेक्टरवर पऱ्हे टाकण्यात आले आहेत. तर १ हजार ४०४ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. ६ हजार ३२० हेक्टरवर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. १ हजार २८० हेक्टरपैकी ४६ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. तुरीच्या ४ हजार २६० हेक्टरपैकी ४५५, तिळाच्या ७०० हेक्टरपैकी ८ हेक्टरवर बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे. पेरणीला उशीर झाल्यानंतर उत्पादनात घट होते. हा शेतकऱ्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन कमीच होईल. या चिंतेने शेतकरी वर्ग ग्रासला आहे. कर्जाचे डोंगर कसे फेडावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)