शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामुळे सार्वभौमत्व प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:52 IST

भारतीय संविधान देशातील जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य देणारा जगातील एकमेव संविधान आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना संविधानात नमूद कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या धर्माच्या प्रत्येनुसार सर्वांना स्वातंत्र्य प्रदान केले आहे.

ठळक मुद्देभुपेंद्र रायपुरे यांचे प्रतिपादन : तळोधी येथे कार्यक्रम

ऑनलाईन लोकमत तळोधी मो. : भारतीय संविधान देशातील जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य देणारा जगातील एकमेव संविधान आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना संविधानात नमूद कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या धर्माच्या प्रत्येनुसार सर्वांना स्वातंत्र्य प्रदान केले आहे. लोकांच्या धार्मिक भावना न दुखावता कायद्याचे पालन करण्याची कसब नमूद आहे. जगात सार्वभौमत्व प्रदान करणारा एकमेव संविधान असल्याचे प्रतिपादन प्रमुख अधिवक्ता अ‍ॅड. भुपेंद्र रायपुरे यांनी केले.तळोधी केंद्रांतर्गत ग्रामपंचायत आवारातील सभागृहात संविधान दिन समारोहाचे आयोजन बुधवारी करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाम रामटेके, गट शिक्षणाधिकारी दीपक देवतळे, धर्मानंद मेश्राम उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी सुरजागडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख गौतम मेश्राम, ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले, पर्यवेक्षिका वाळके, मुख्याध्यापक बोमनवार, मारोती दुधबावरे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक रमेश बारसागडे यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना केलेल्या चिंतनावर भर टाकला. शाम रामटेके यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. धर्मानंद मेश्राम यांनी संविधान संहितेच्या वापराबाबतची माहिती दिली. दीपक देवतळे यांनी संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मारोती दुधबावरे, संचालन केंद्र प्रमुख गौतम मेश्राम तर आभार मुख्याध्यापक बोमनवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेच्या कर्मचाºयांनी, शिक्षकांनी सहकार्य केले.