शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

दक्षिण गडचिरोलीत पुरामुळे हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2022 05:00 IST

दक्षिण भागातील भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे सर्वच नाल्यांसह मोठ्या नद्यांनाही पूर आला. त्यातच गोसीखुर्द धरणाचे ११ गेट उघडण्यात आले. चिचडोह बॅरेजचेही सर्व ३८ गेट उघडे असून पावसामुळे त्यातील विसर्गही वाढला आहे. त्यामुळे काही प्रमुख नद्या आणि उपनद्यांची पाणीपातळी वाढली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये शनिवारी सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या नद्यांसह नाल्यांचे पाणी पुलावरून वाहत असल्याने काही प्रमुख मार्गांसह दुर्गम भागातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. काही गावांमधील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे काही गावेही जलमय झाली आहेत. दरम्यान, पेरमिलीजवळ एक लाईनमनचा नाल्याच्या पुरात बुडून मृत्यू झाला आहे. याशिवाय पुरात अडकलेल्या काही लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.दक्षिण भागातील भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे सर्वच नाल्यांसह मोठ्या नद्यांनाही पूर आला. त्यातच गोसीखुर्द धरणाचे ११ गेट उघडण्यात आले. चिचडोह बॅरेजचेही सर्व ३८ गेट उघडे असून पावसामुळे त्यातील विसर्गही वाढला आहे. त्यामुळे काही प्रमुख नद्या आणि उपनद्यांची पाणीपातळी वाढली.

पुरात अडकलेल्यांना हलविले दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने पुरात अडकलेल्या गोलाकर्जी येथील २० लोकांना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हलविण्यात आले आहे. तसेच लिंगमपल्ली येथील २५ लोकांना गावातील उंच स्थळी स्थलांतरित केले जात आहे. याशिवाय आलापल्लीवरून पेरमिलीकडे निघालेल्या २ महिला आणि एका पुरुषाला पेरमिलीच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे पलीकडे जाता येत नव्हते. त्याचवेळी दुसऱ्या बाजुने नाल्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यांना सुरक्षित स्थळी जाणे कठीण झाले. पेरमिली उपपोलीस स्टेशनच्या पथकाने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने किती लोक अडकलेले आहेत याची पाहणी केली असता ते व्यक्ती उंचवट्याच्या ठिकाणी थांबलेले आढळले. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची कार्यवाही बचाव पथकामार्फत सुरू आहे.

या मार्गावरील वाहतूक थांबली

पुरामुळे ताडगाव ते हेमलकसा या दरम्यान कुमरगुडा नाला आणि हेमलकसा नाल्यावरील रपटे वाहून गेल्यामुळे वाहतूक थांबली आहे. आष्टी ते आलापल्ली मार्गात चौडंगपल्ली नाल्याच्या पुराचे पाणी पुलावरून वाहात असल्याने वाहतूक ठप्प आहे. कमनचेरू ते आलापल्ली मार्गावर तानबोडी नाल्याच्या पुरामुळे वाहतूक बंद आहे. तसेच नागेपल्ली ते अहेरी मार्गावरील नाल्याच्या पुरामुळे वाहतूक बंद पडली आहे. सिरोंचाकडून छत्तीसगडकडे जाणाऱ्या मार्गावरही पुलावर पाणी असल्याने वाहतूक बंद आहे.

सतर्कता बाळगा, धर्मरावबाबांचे आवाहन -    दुर्गम भागातील गावांचा संपर्क मुख्यालयाशी तुटला आहे. ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क व सुरक्षित राहावे, पाण्याचा अंदाज नसल्यास पुलावरून वाहने किंवा स्वतः वाहत्या पाण्यातून मार्ग काढत जाऊ नये, सुरक्षित ठिकाणी विसावा घ्यावा, पाणी ओसरल्यानंतरच घरी किंवा शेतशिवारात जावे, लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी सोडू नये याची खबरदारी घ्यावी. तसेच ग्रामस्थांनी गुरे ढोरे पाण्यात सोडू नये. नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी अथवा इतर कुठल्याही कारणास्तव जाऊ नये, असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

 

टॅग्स :floodपूर