शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

परिचालकांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: December 16, 2014 22:53 IST

शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण भागाने १९ एप्रिल २०११ रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करण्यात आली. या संग्राम कक्षामध्ये

गडचिरोली : शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण भागाने १९ एप्रिल २०११ रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करण्यात आली. या संग्राम कक्षामध्ये मानधन तत्वावर संगणक परिचालकांची नियुक्तीही करण्यात आली. मात्र अल्पश: वेतनावर संगणक परिचालकांकडून काम करवून घेतले जात आहे. त्यामुळे संगणक परिचालकांचे मानधन न वाढविल्यास कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून संघटनेने दिला आहे. शासन निर्णयानुसार संगणक परिचालकांना दरमहा ८ हजार रूपये मानधन देण्याचे निश्चित देण्यात आले. प्रत्यक्ष मानधन देतांना पदवीधर नसलेल्यांना ३ हजार ५०० तर पदवीधारकांना ३ हजार ८०० रूपये अदा केले जाते. संगणक परिचालकांना शासकीय सेवेत कायम करावे, २००० प्रमाणे वाढीव भत्ता देण्यात यावा, दरमहा ८ हजार वेतन देण्यात यावे, दर महिन्यात देण्यात येणाऱ्या ४५० एंट्री रद्द कराव्यात, महिला संगणक परिचालकांना प्रसुती रजा वाढवून देण्यात याव्या, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये नेट कनेक्टीव्हीटीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार मानधन वाढविण्याची मागणी परिचालकांच्यावतीने करण्यात आली. मात्र शासन स्तरावर अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. संगणक परिचालकांना शासन सेवेत कायम न केल्यास त्याबरोबर दरमहा ८ हजार रूपये मानधन न दिल्यास बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)