शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

केजीबीव्हीतील समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:18 IST

येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील २८ विद्यार्थिनी आजारी पडल्या. एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे केजीबीव्हीतील समस्या १५ दिवसांच्या आत सोडवाव्या, अन्यथा जिल्हाधिकाºयांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिला.

ठळक मुद्देकाँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट : समस्या न सुटल्यास जिल्हाधिकाºयांना घेराव घालणार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील २८ विद्यार्थिनी आजारी पडल्या. एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे केजीबीव्हीतील समस्या १५ दिवसांच्या आत सोडवाव्या, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिला.डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना गुरूवारी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. तसेच विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. चर्चेदरम्यान उपस्थित कर्मचारी व विद्यार्थिनींनी विद्यालयातील अनेक समस्या मांडल्या. स्थानिक प्रशासन व शासनाच्या निष्काळजीपणामुळे तसेच लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विद्यालयात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एकीकडे सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ व स्वच्छ भारत मिशनची घोषणा देत असले तरी मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला.येथील कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करतात. पगारही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. येथील कर्मचाºयांना वेळेवर पगार द्यावा व त्यांची पगारवाढ करावी, गृहपालाचे पद भरावे, २४ तास गृहपाल व चौकीदार नेमावा, विविध योजनांद्वारे येणारा निधी वेळेवर वितरित करावा, पिण्याचे पाणी, उत्कृष्ट जेवण द्यावे, अशी मागणी करीत १०० विद्यार्थिनी प्रवेश मर्यादा असतानाही १८० विद्यार्थिनींची कशी काय भरती करण्यात आली. तसेच त्यांच्या निवासाची योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवालही डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला. यावेळी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, जि. प. सदस्य मनोहर पोरेटी, कल्पना वड्डे, अ‍ॅड. गजानन दुगा, नगरसेविका वंदना उंदीरवाडे, मंगला मडावी, रामचंद्र गोटा, जमीर कुरेशी, परसराम पदा, कुलदीप इंदूरकर, नरेश भैसारे, मिलींद किरंगे, भूषण भैसारे, विनोद लेनगुरे, बसीर पिराणी हजर होते.

टॅग्स :congressकाँग्रेस