शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतकऱ्यांच्या समस्या साेडवा, अन्यथा आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेरची : शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या ९ फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्यात याव्यात, अन्यथा महाग्रामसभेच्या वतीने १० फेब्रुवारीला काेरची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेरची : शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या ९ फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्यात याव्यात, अन्यथा महाग्रामसभेच्या वतीने १० फेब्रुवारीला काेरची तहसील कार्यालयावर माेर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात काेरचीच्या तहसीलदारांमार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या नावे निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून काेणतीही मदत अजूनपर्यंत मिळाली नाही.

शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्यात यावे. एमपीएससी कायदा लागू करावा, दुष्काळग्रस्त कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी. शेतकऱ्यांचे बँकांकडून घेतलेले पीक कर्ज पुनर्गठन करण्याचे आदेश असताना बँकांकडून होणारी सक्तीची वसुली बंद करण्यात यावी. तालुक्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी काढलेल्या प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम तत्काळ जमा करावी. काेरची तालुक्यातील शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे वीजबिल माफ करावे तसेच प्रलंबित असलेले शेतातील वीज कनेक्शन तातडीने जोडून देण्यात यावे.

तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये व नगरपंचायत क्षेत्रात १०० दिवसांचा राेजगार राेहयाेअंतर्गत देण्यात यावा. तालुका मुख्यालयात भारतीय स्टेट बँकेची नवीन शाखा सुरू करावी, वन हक्क प्राप्त सातबारावर धान्य खरेदी करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या मागण्यांसाठी १० फेब्रुवारीला काेरची येथील गाेटूल भूमीवरून तहसील कार्यालयावर माेर्चा काढण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना झाडूराम हलामी, राजेश नैताम, अशोक गावतुरे, राजाराम नैताम, नरेंद्र सलामे, शीतल नैताम, पवन कोराम, जागेश्वर कोरेटी, रुपेश कुमरे, पंजाबराव उईके, मोहनलाल कुमरे, कुमारीबाई जमकातन, सुलवंती पोरेटी, मंजुबाई घावडे, कलेश्‍वरी काटेंगे, कुमारोबाई गोटा, रामबाई कोडापे, मदनलाल पोरेटी, ईजामसाय काटेंगे आदी उपस्थित हाेते.