शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

स्वजल योजनेतून सौर ऊर्जेने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:04 IST

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विजेची समस्या आणि त्यामुळे येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सौर उर्जेवर चालणाऱ्या लघु पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. ‘स्वजल’ या केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात ही सोय करण्यास मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देआकांक्षित गडचिरोलीसाठी केंद्राचा उपक्रम : १० टक्के लोकसहभागातून मागेल त्या गावाला मिळणार लाभ

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विजेची समस्या आणि त्यामुळे येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सौर उर्जेवर चालणाऱ्या लघु पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. ‘स्वजल’ या केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात ही सोय करण्यास मंजुरी मिळाली आहे.या योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी अस्तित्वात असलेल्या बोअरवेलवर (हातपंप) सौर उर्जेवर चालणारे मोटारपंप लावून गावात पाण्याची पाईपलाईनसुद्धा टाकली जाणार आहे. राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची सोय होणार आहे. त्यापैकी वाशिम, उस्मानाबाद आणि नंदूरबार या आकांक्षित जिल्ह्यांमधील काही ठराविक तालुक्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सर्वच तालुक्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे विशेष. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय, स्वयंपाक आणि इतर सुविधांसाठी तसेच जनावरांकरिता शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी देशभरातील आकांक्षित जिल्ह्यात ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ग्रामसभेचा ठराव घेऊन या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या गाव किंवा वस्तीमध्येच ही योजना मंजूर केली जाणार आहे. योजना कार्यान्वित केल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत/ग्रामसभेची राहणार आहे. मात्र त्या पाईपलाईनवरून आपल्या घरात स्वतंत्र नळ कनेक्शन घ्यायचे असल्यास त्याचा खर्च संबंधित गावातील रहिवाशांना करावा लागणार आहे.योजनेची मागणी करणारा प्रस्ताव ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेकडून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील तांत्रिक शाखेकडून या योजनेचा आराखडा तयार केला जाईल. तो मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. तेथून मान्यता मिळाल्यानंतरच ही योजना त्या गावात अंमलात आणली जाईल, असे तांत्रिक विभागाचे उपअभियंता एस.आर.माटे यांनी सांगितले. या योजनेची माहिती व जनजागृती होण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.असे आहेत निवडीचे निकषस्वजल योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गाव, वस्ती हागणदारीमुक्त असली पाहीजे. कमीत कमी १० घरांची लोकवस्ती आवश्यक, यापूर्वीची कोणतीही नळ पाणी पुरवठा योजना गावात नको. केंद्रीय भूजल बोर्ड यांचेकडून सुरक्षित ठिकाण घोषित केलेल्या स्त्रोतांवर ही योजना घेणे बंधनकारक राहणार आहे. लोकवर्गणी आणि देखभाल दुरूस्ती निधीकरिता बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागेल.१० टक्के लोकवर्गणी आवश्यकया योजनेत एका गावासाठी साधारणत: ५ लाखांपासून ४५ लाखांपर्यंतच्या खर्चाच्या आराखड्याला मंजुरी मिळू शकते. या खर्चात ४५ टक्के निधी केंद्र सरकारकडून तर ४५ टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. याशिवाय १० टक्के रक्कम लोकवर्गणीतून गोळा करणे आवश्यक आहे. ज्या गावाची लोकवर्गणी गोळा करण्याची क्षमता नसेल त्या गावात ग्रामकोषातून किंवा आमदार-खासदार फंडातून ही रक्कम भरण्याची सोय केली जाऊ शकते.सौर उर्जेतून चालणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचा जास्तीत जास्त लाभ गडचिरोली जिल्ह्याला मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळे या योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून त्याचा लाभ ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना निश्चितपणे होऊन त्यांची शुद्ध पाण्याची समस्या दूर होईल.- अशोक नेते, खासदार, गडचिरोली

टॅग्स :Waterपाणी