शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

वृद्धापकाळात सामाजिक सुरक्षेची गरज- संपदा मेहता

By admin | Updated: July 17, 2015 01:43 IST

वृद्धापकाळात श्रम करण्याची क्षमता कमी होते. मात्र औषधोपचार व इतर खर्च वाढतात.

जनजागृती अभियान : जिल्हा अग्रणी बँकेच्या मार्फत कार्यक्रमाचे आयोजनगडचिरोली : वृद्धापकाळात श्रम करण्याची क्षमता कमी होते. मात्र औषधोपचार व इतर खर्च वाढतात. त्यामुळे वृद्धापकाळात एक निश्चित उत्पन्न मिळत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने केंद्र शासनाने सुरू केलेली अटल पेंशन योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी केले.जिल्हा अग्रणी बँकेच्या (बँक आॅफ इंडिया) मार्फतीने जनजागृती अभियानाचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात गुरूवारी करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक डी. के. सिलारे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. बारापात्रे, महाबँकेचे व्यवस्थापक सुंदरलाल सेता, विदर्भ ग्रामीण कोेकण बँकेचे व्यवस्थापक प्रभाकर बेले, स्टेट बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक तुषार मेश्राम, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र शासनाने अटल पेंशन योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, आधार नोंदणी, जनधन योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा महत्त्वाचा उद्देश नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. त्यामुळे या योजनेची माहिती ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचून याचा लाभ त्यांना घेत यावा, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या बँक व्यवस्थापकांनी या योजनांबाबतची माहिती नागरिकांना दिली व त्याचे महत्त्व सुद्धा पटवून दिले. कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.पुढे मार्गदर्शन करताना मेहता म्हणाल्या की, जोपर्यंत नागरिकांना योजनांची माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्या योजना राबविणे कठिण होऊन बसते. त्यामुळे योजनांची माहिती सर्वसामान्य व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. माहिती मिळाल्यास योजना राबविण्यास गती प्राप्त होते, असेही प्रतिपादन केले. महागाईचा विचार केला तर अटल पेंशनच्या माध्यमातून मिळणारा लाभ ४० वर्षानंतर कमीही असू शकतो. मात्र एक निश्चित उत्पन्न मिळत राहत असल्याने संबंधित व्यक्तीला वृद्धापकाळात अत्यंत मोलाची मदत होते. सामाजिक सुरक्षेच्या योजनांमध्ये आर्थिक विचारापेक्षा एक निश्चित उत्पन्न मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मेहता यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक डी. के. सिलारे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)