शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वृद्धापकाळात सामाजिक सुरक्षेची गरज- संपदा मेहता

By admin | Updated: July 17, 2015 01:43 IST

वृद्धापकाळात श्रम करण्याची क्षमता कमी होते. मात्र औषधोपचार व इतर खर्च वाढतात.

जनजागृती अभियान : जिल्हा अग्रणी बँकेच्या मार्फत कार्यक्रमाचे आयोजनगडचिरोली : वृद्धापकाळात श्रम करण्याची क्षमता कमी होते. मात्र औषधोपचार व इतर खर्च वाढतात. त्यामुळे वृद्धापकाळात एक निश्चित उत्पन्न मिळत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने केंद्र शासनाने सुरू केलेली अटल पेंशन योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी केले.जिल्हा अग्रणी बँकेच्या (बँक आॅफ इंडिया) मार्फतीने जनजागृती अभियानाचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात गुरूवारी करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक डी. के. सिलारे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. बारापात्रे, महाबँकेचे व्यवस्थापक सुंदरलाल सेता, विदर्भ ग्रामीण कोेकण बँकेचे व्यवस्थापक प्रभाकर बेले, स्टेट बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक तुषार मेश्राम, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र शासनाने अटल पेंशन योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, आधार नोंदणी, जनधन योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा महत्त्वाचा उद्देश नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. त्यामुळे या योजनेची माहिती ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचून याचा लाभ त्यांना घेत यावा, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या बँक व्यवस्थापकांनी या योजनांबाबतची माहिती नागरिकांना दिली व त्याचे महत्त्व सुद्धा पटवून दिले. कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.पुढे मार्गदर्शन करताना मेहता म्हणाल्या की, जोपर्यंत नागरिकांना योजनांची माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्या योजना राबविणे कठिण होऊन बसते. त्यामुळे योजनांची माहिती सर्वसामान्य व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. माहिती मिळाल्यास योजना राबविण्यास गती प्राप्त होते, असेही प्रतिपादन केले. महागाईचा विचार केला तर अटल पेंशनच्या माध्यमातून मिळणारा लाभ ४० वर्षानंतर कमीही असू शकतो. मात्र एक निश्चित उत्पन्न मिळत राहत असल्याने संबंधित व्यक्तीला वृद्धापकाळात अत्यंत मोलाची मदत होते. सामाजिक सुरक्षेच्या योजनांमध्ये आर्थिक विचारापेक्षा एक निश्चित उत्पन्न मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मेहता यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक डी. के. सिलारे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)