शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

मग ‘एक्साईज’ची गरज काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:28 IST

गेल्या २५ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बंदी दारू कोणत्याही कोपऱ्यात मिळते हे सर्वश्रृत आहे. विदेशी दारू कशी मिळते, कुठून येते, कोण आणते याची माहिती दारू रोखण्याची जबाबदारी असणाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या २५ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बंदी दारू कोणत्याही कोपऱ्यात मिळते हे सर्वश्रृत आहे. विदेशी दारू कशी मिळते, कुठून येते, कोण आणते याची माहिती दारू रोखण्याची जबाबदारी असणाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. रात्रीच्या अंधारात चालणारा हा व्यवहार सामान्य माणसाला उघडपणे दिसत नाही हा भाग निराळा. मात्र ग्रामीण भागात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात काढल्या जाणारी हातभट्टीची दारू खुलेआमपणे दिसत असतानाही ती रोखण्याचे धाडस केले जात नाही, ही वास्तविकता आहे.खरं म्हणजे हातभट्टीसारख्या अवैध दारूला आळा घालण्याचे काम पोलिसांपेक्षा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहे. पण होणाऱ्या कारवायांचे प्रमाण पाहिले तर या जिल्ह्यात एक्साईज विभाग आहे की नाही, अशी शंका यायला लागते. इतर जिल्ह्यांत अधिकृत दारूची नियमानुसार विक्री वाढवून महसुलाचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्याचे काम हाच एक्साईज विभाग करतो. त्यासाठी शासनाच्या महसूल बुडतो म्हणून हातभट्ट्यांवर नियमित कारवाया केल्या जातात. पण गडचिरोली जिल्ह्यात हातभट्टीची दारू इतर जिल्ह्यांच्या तुलनेत किमान १० पटीने जास्त असताना कारवाया मात्र नगण्य आहेत. तब्बल दोन-दोन लाख रुपयांचा सडवा दोन-तीन छोट्या गावात मिळतो तर जिल्हाभरातील दिड हजारांवर गावांत किती दारू गाळली जात असेल याची कल्पना येते. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपा काढतो. कारवाया का होत नाही, असे विचारले तर ‘आमच्याकडे स्टाफच नाही’ असे म्हणून या विभागाचे अधिकारी मोकळे होतात. पण केवळ या उत्तराने त्यांची जबाबदारी संपते असे नाही. मुळात कारवाई करायची असेल तर इतर जिल्ह्यांच्या स्टाफचे सहकार्य घेऊन अधूनमधून मोहीम राबवितात येतात. बाकी जिल्ह्यात लगतच्या जिल्ह्याची मदत घेऊन अशा मोहीमा सुरू असतात. मग गडचिरोलीतच का नाही? आणि जर काहीच करायचे नसेल तर या विभागाची जिल्ह्यात गरज काय?प्रत्येक गावावर बारीक लक्ष ठेवणाऱ्या पोलीस विभागालाही गावातल्या हातभट्ट्यांची कल्पना असते. पण मुक्तीपथवाल्यांनी सांगितले म्हणून (नाईलाजाने?) ते अलिकडे कारवाया करायला लागले. व्यसनमुक्तीसाठी व्यसनी माणसाची मानसिकता बदलविणे हाच उपाय आहे. पिणाराच नसेल तर दारू गाळणे आपोआप बंद होईल. त्यामुळे मुक्तीपथवाल्यांनी दारू पकडण्यापेक्षा जनजागृतीवर जास्त भर दिला पाहीजे. उगीच पोलीसवाल्यांना दिसले नाही ते आपण त्यांना दाखविले अशा गैरसमजुतीत राहू नये. पोलिसांना सर्वच माहीत असते. बस कारवाई करण्याची मानसिक तयारी नसते.