शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मग ‘एक्साईज’ची गरज काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:28 IST

गेल्या २५ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बंदी दारू कोणत्याही कोपऱ्यात मिळते हे सर्वश्रृत आहे. विदेशी दारू कशी मिळते, कुठून येते, कोण आणते याची माहिती दारू रोखण्याची जबाबदारी असणाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या २५ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बंदी दारू कोणत्याही कोपऱ्यात मिळते हे सर्वश्रृत आहे. विदेशी दारू कशी मिळते, कुठून येते, कोण आणते याची माहिती दारू रोखण्याची जबाबदारी असणाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. रात्रीच्या अंधारात चालणारा हा व्यवहार सामान्य माणसाला उघडपणे दिसत नाही हा भाग निराळा. मात्र ग्रामीण भागात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात काढल्या जाणारी हातभट्टीची दारू खुलेआमपणे दिसत असतानाही ती रोखण्याचे धाडस केले जात नाही, ही वास्तविकता आहे.खरं म्हणजे हातभट्टीसारख्या अवैध दारूला आळा घालण्याचे काम पोलिसांपेक्षा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहे. पण होणाऱ्या कारवायांचे प्रमाण पाहिले तर या जिल्ह्यात एक्साईज विभाग आहे की नाही, अशी शंका यायला लागते. इतर जिल्ह्यांत अधिकृत दारूची नियमानुसार विक्री वाढवून महसुलाचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्याचे काम हाच एक्साईज विभाग करतो. त्यासाठी शासनाच्या महसूल बुडतो म्हणून हातभट्ट्यांवर नियमित कारवाया केल्या जातात. पण गडचिरोली जिल्ह्यात हातभट्टीची दारू इतर जिल्ह्यांच्या तुलनेत किमान १० पटीने जास्त असताना कारवाया मात्र नगण्य आहेत. तब्बल दोन-दोन लाख रुपयांचा सडवा दोन-तीन छोट्या गावात मिळतो तर जिल्हाभरातील दिड हजारांवर गावांत किती दारू गाळली जात असेल याची कल्पना येते. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपा काढतो. कारवाया का होत नाही, असे विचारले तर ‘आमच्याकडे स्टाफच नाही’ असे म्हणून या विभागाचे अधिकारी मोकळे होतात. पण केवळ या उत्तराने त्यांची जबाबदारी संपते असे नाही. मुळात कारवाई करायची असेल तर इतर जिल्ह्यांच्या स्टाफचे सहकार्य घेऊन अधूनमधून मोहीम राबवितात येतात. बाकी जिल्ह्यात लगतच्या जिल्ह्याची मदत घेऊन अशा मोहीमा सुरू असतात. मग गडचिरोलीतच का नाही? आणि जर काहीच करायचे नसेल तर या विभागाची जिल्ह्यात गरज काय?प्रत्येक गावावर बारीक लक्ष ठेवणाऱ्या पोलीस विभागालाही गावातल्या हातभट्ट्यांची कल्पना असते. पण मुक्तीपथवाल्यांनी सांगितले म्हणून (नाईलाजाने?) ते अलिकडे कारवाया करायला लागले. व्यसनमुक्तीसाठी व्यसनी माणसाची मानसिकता बदलविणे हाच उपाय आहे. पिणाराच नसेल तर दारू गाळणे आपोआप बंद होईल. त्यामुळे मुक्तीपथवाल्यांनी दारू पकडण्यापेक्षा जनजागृतीवर जास्त भर दिला पाहीजे. उगीच पोलीसवाल्यांना दिसले नाही ते आपण त्यांना दाखविले अशा गैरसमजुतीत राहू नये. पोलिसांना सर्वच माहीत असते. बस कारवाई करण्याची मानसिक तयारी नसते.