शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून विदर्भातला माणूस मुंबईतही व-हाडी बोलू लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 19:14 IST

पूर्वी मुंबई-पुण्याकडे विदर्भातला माणूस आपल्या व-हाडी ठसक्यात बोलायला कचरत असे. चुकून तोंडातून एखादा शब्द व-हाडी निघाला तरी समोरची व्यक्ती त्यांना हिणवत असे.

- मनोज ताजने गडचिरोली : पूर्वी मुंबई-पुण्याकडे विदर्भातला माणूस आपल्या व-हाडी ठसक्यात बोलायला कचरत असे. चुकून तोंडातून एखादा शब्द व-हाडी निघाला तरी समोरची व्यक्ती त्यांना हिणवत असे. पण आता विदर्भाच्या व-हाडी भाषेने मुंबईसह महाराष्ट्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे कोणी व-हाडी ठसक्यात बोलताना न्युनगंड बाळगत नाही याचा आनंद वाटतो, असे मनोगत प्रसिद्ध विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कार्यक्रमासाठी गणेशपुरे सोमवारी गडचिरोलीत आले असताना लोकमतशी बोलत होते. मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले गणेशपुरे यांनी आतापर्यंत ४० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांत, टीव्हीवरील अनेक मराठी मालिकांत आणि रिअ‍ॅलिटी शो मध्ये काम करताना मराठी प्रेक्षकांच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत विदर्भातच राहिले असल्यामुळे व-हाडी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. मुंबईत अभिनयक्षेत्र गाजवत असतानाही त्यांनी आपला व-हाडी बाणा सोडलेला नाही. अनेक टीव्ही शो किंवा विशेष कार्यक्रमांमध्ये व-हाडी भाषेचा वापर ते आवर्जून करताना दिसतात.बोलण्यात एखादा व-हाडी शब्दप्रयोग झाला तरी हिणवल्या जाणाऱ्या १५ वर्षांपूर्वीच्या काळात कॅमेरासमोर व-हाडीचा सर्रास वापर करण्याची हिंमत कशी केली, या प्रश्नावर गणेशपुरे म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत कोल्हापुरी, सांगली-साता-याकडील वेगळा टोन सर्रास वापरला जात असताना विदर्भाची व-हाडी मात्र त्यांना माहीतच नव्हती. त्यामुळे मी जाणीवपूर्वक व-हाडीचा वापर करत आलो. विनोदी भूमिका साकारताना व-हाडीतून केलेले विनोद प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे व-हाडीचा वापर करताना पूर्वी अनेकांना वाटत असलेला न्युनगंड आता दूर झाला आहे. विदर्भातील मूळचे रहिवासी असलेले अनेक अधिकारी आता मुंबईत बोलताना व-हाडीचा वापर बिनदिक्कतपणे करत असल्याचे त्यांनीच आपल्याला सांगितले, असे गणेशपुरे म्हणाले.पूर्व विदर्भातल्या झाडीपट्टी रंगभूमीला कित्येक वर्षांची नाटकांची समृद्ध परंपरा आहे. आता तर मुंबई-पुण्यापर्यंत झाडीपट्टी रंगभूमीची ओळख झाली आहे. मला पण झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये काम करायला आवडेल, पण अलिकडे शेड्युल व्यस्त असते. त्यामुळे सलग तारखांमध्ये नाटकाचे बुकिंग असेल तर झाडीपट्टी रंगभूमीवर निश्चित काम करणार, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मुंबईत कितीही व्यस्त असलो तरी गावाची ओढ कमी होत नाही. सण-उत्सवाच्या काळात आवर्जुन पावलं गावाकडे वळतात. विशेषत: महालक्ष्मी पूजनासाठी दरवर्षी अमरावतीला येण्यासाठी माझे दिवस राखीव असतात, असेही गणेशपुरे यांनी सांगितले.