शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

...म्हणून विदर्भातला माणूस मुंबईतही व-हाडी बोलू लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 19:14 IST

पूर्वी मुंबई-पुण्याकडे विदर्भातला माणूस आपल्या व-हाडी ठसक्यात बोलायला कचरत असे. चुकून तोंडातून एखादा शब्द व-हाडी निघाला तरी समोरची व्यक्ती त्यांना हिणवत असे.

- मनोज ताजने गडचिरोली : पूर्वी मुंबई-पुण्याकडे विदर्भातला माणूस आपल्या व-हाडी ठसक्यात बोलायला कचरत असे. चुकून तोंडातून एखादा शब्द व-हाडी निघाला तरी समोरची व्यक्ती त्यांना हिणवत असे. पण आता विदर्भाच्या व-हाडी भाषेने मुंबईसह महाराष्ट्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे कोणी व-हाडी ठसक्यात बोलताना न्युनगंड बाळगत नाही याचा आनंद वाटतो, असे मनोगत प्रसिद्ध विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कार्यक्रमासाठी गणेशपुरे सोमवारी गडचिरोलीत आले असताना लोकमतशी बोलत होते. मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले गणेशपुरे यांनी आतापर्यंत ४० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांत, टीव्हीवरील अनेक मराठी मालिकांत आणि रिअ‍ॅलिटी शो मध्ये काम करताना मराठी प्रेक्षकांच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत विदर्भातच राहिले असल्यामुळे व-हाडी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. मुंबईत अभिनयक्षेत्र गाजवत असतानाही त्यांनी आपला व-हाडी बाणा सोडलेला नाही. अनेक टीव्ही शो किंवा विशेष कार्यक्रमांमध्ये व-हाडी भाषेचा वापर ते आवर्जून करताना दिसतात.बोलण्यात एखादा व-हाडी शब्दप्रयोग झाला तरी हिणवल्या जाणाऱ्या १५ वर्षांपूर्वीच्या काळात कॅमेरासमोर व-हाडीचा सर्रास वापर करण्याची हिंमत कशी केली, या प्रश्नावर गणेशपुरे म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत कोल्हापुरी, सांगली-साता-याकडील वेगळा टोन सर्रास वापरला जात असताना विदर्भाची व-हाडी मात्र त्यांना माहीतच नव्हती. त्यामुळे मी जाणीवपूर्वक व-हाडीचा वापर करत आलो. विनोदी भूमिका साकारताना व-हाडीतून केलेले विनोद प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे व-हाडीचा वापर करताना पूर्वी अनेकांना वाटत असलेला न्युनगंड आता दूर झाला आहे. विदर्भातील मूळचे रहिवासी असलेले अनेक अधिकारी आता मुंबईत बोलताना व-हाडीचा वापर बिनदिक्कतपणे करत असल्याचे त्यांनीच आपल्याला सांगितले, असे गणेशपुरे म्हणाले.पूर्व विदर्भातल्या झाडीपट्टी रंगभूमीला कित्येक वर्षांची नाटकांची समृद्ध परंपरा आहे. आता तर मुंबई-पुण्यापर्यंत झाडीपट्टी रंगभूमीची ओळख झाली आहे. मला पण झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये काम करायला आवडेल, पण अलिकडे शेड्युल व्यस्त असते. त्यामुळे सलग तारखांमध्ये नाटकाचे बुकिंग असेल तर झाडीपट्टी रंगभूमीवर निश्चित काम करणार, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मुंबईत कितीही व्यस्त असलो तरी गावाची ओढ कमी होत नाही. सण-उत्सवाच्या काळात आवर्जुन पावलं गावाकडे वळतात. विशेषत: महालक्ष्मी पूजनासाठी दरवर्षी अमरावतीला येण्यासाठी माझे दिवस राखीव असतात, असेही गणेशपुरे यांनी सांगितले.