शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

... तर शेतकऱ्यांना जंगलालगतची शेती ठेवावी लागणार पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

मागील वर्षी तर वाघांच्या हल्ल्यांनी मर्यादाच ओलांडली. यावर्षी सुद्धा आतापर्यंत पाच लाेकांचा बळी वाघाने घेतला. वाघांकडून पाळीव जनावरांवर हल्ले हाेतच आहेत. ह्या घटना ताज्या असतानाच जंगलालगत असलेली शेती कसताना पेरणीपूर्व मशागतीत वाघांचा धाेका सर्वाधिक आहे. वनविभागाने शेतकऱ्यांसाठी याेग्य उपाययाेजना न केल्यास वनालगतची शेती पडिक राहण्याची शक्यता आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिराेली जिल्ह्यात लाेकांमध्ये वाघांची दहशत सुरू झाली. दिवसेंदिवस हा धाेका कमी हाेताना दिसत नाही. मागील वर्षी तर वाघांच्या हल्ल्यांनी मर्यादाच ओलांडली. यावर्षी सुद्धा आतापर्यंत पाच लाेकांचा बळी वाघाने घेतला. वाघांकडून पाळीव जनावरांवर हल्ले हाेतच आहेत. ह्या घटना ताज्या असतानाच जंगलालगत असलेली शेती कसताना पेरणीपूर्व मशागतीत वाघांचा धाेका सर्वाधिक आहे. वनविभागाने शेतकऱ्यांसाठी याेग्य उपाययाेजना न केल्यास वनालगतची शेती पडिक राहण्याची शक्यता आहे.गडचिराेली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून वाघ, बिबट तसेच अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून मानवावर हल्ले हाेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. सुरुवातीला आरमाेरी व देसाईगंज तालुक्यात, त्यानंतर गडचिराेली तालुक्यात वाघांच्या हल्ल्यांनी कहरच केला.  २७ जानेवारी २०१९ पासून १४ मे २०२२ पर्यंत एकूण ३० लाेकांचा बळी वाघ व बिबट्यांनी घेतला. २०२२ मध्ये २० जानेवारी राेजी आरमाेरी तालुक्यातील कुरंझा येथील इसमाला वाघाने ठार केले तर याच वर्षी १३ व १४ मे राेजी अरसाेडा व आरमाेरी येथील महिला व पुरुषाला वाघाने त्याच्याच शेतात ठार केले. उन्हाळ्यात जंगल शुष्क असतानाही वाघाने लपूनछपून हल्ले केले. आता तर वनराई बहरली आहे. पेरणीपूर्व मशागतीला सुरुवातही झाली आहे. अशास्थितीत शेतकरी शेतात भीती मनात ठेवूनच जात आहेत. त्यातही ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलालगत आहे व त्याच परिसरात वाघाची दहशत आहे, अशा ठिकाणी जाण्यास शेतकरी धजावत नाही. मागील वर्षीसुद्धा बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी वाघाच्या दहशतीमुळे जंगलालगतची शेती पडिक ठेवली.

काेणकाेणत्या गावातील शेतकऱ्यांना धाेका?गडचिराेली व वडसा वनविभागातील शेतकऱ्यांना वाघाच्या हल्ल्याचा सर्वाधिक धाेका आहे.

-    गडचिराेली तालुक्यातील जेप्रा-दिभना परिसरातील पाच गावे,धुंडेशिवणी परिसर चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गाेगाव तसेच टेंभा चांभार्डा, मरेगाव, अमिर्झा कळमटाेला, आंबेटाेला, आंबेशिवणी, राजगाटा-    आरमाेरी तालुक्यातील सिर्सी, गणेशपूर, इंजेवारी, कुरंझा, देलाेडा, अरसाेडा तसेच कासवी परिसर देसाईगंज तालुक्यातील कुरूड, काेंढाळा, शिवराजपूर परिसर आदी गावांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक धाेका आहे.

आतापर्यंत किती बळी? गडचिराेली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात वाघ-बिबट्यांनी आतापर्यंत ३० लाेकांचा बळी घेतला. वाघांनी २५ लाेकांना ठार केले तर बिबट्यांनी ५ लाेकांचा बळी घेतला. बिबट बळींमध्ये  चंद्रपूर जिल्ह्यातील एका लहान मुलांचाही समावेश आहे. चालू वर्षात एकूण ५ बळी वाघांनी घेतले. यामध्ये आरमाेरी तालुक्यातील तीन तर देसाईगंज तालुक्यातील दाेघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चार पुरूष व एक महिला ठार झाली.

 

टॅग्स :FarmerशेतकरीTigerवाघ