शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

... तर शेतकऱ्यांना जंगलालगतची शेती ठेवावी लागणार पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

मागील वर्षी तर वाघांच्या हल्ल्यांनी मर्यादाच ओलांडली. यावर्षी सुद्धा आतापर्यंत पाच लाेकांचा बळी वाघाने घेतला. वाघांकडून पाळीव जनावरांवर हल्ले हाेतच आहेत. ह्या घटना ताज्या असतानाच जंगलालगत असलेली शेती कसताना पेरणीपूर्व मशागतीत वाघांचा धाेका सर्वाधिक आहे. वनविभागाने शेतकऱ्यांसाठी याेग्य उपाययाेजना न केल्यास वनालगतची शेती पडिक राहण्याची शक्यता आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिराेली जिल्ह्यात लाेकांमध्ये वाघांची दहशत सुरू झाली. दिवसेंदिवस हा धाेका कमी हाेताना दिसत नाही. मागील वर्षी तर वाघांच्या हल्ल्यांनी मर्यादाच ओलांडली. यावर्षी सुद्धा आतापर्यंत पाच लाेकांचा बळी वाघाने घेतला. वाघांकडून पाळीव जनावरांवर हल्ले हाेतच आहेत. ह्या घटना ताज्या असतानाच जंगलालगत असलेली शेती कसताना पेरणीपूर्व मशागतीत वाघांचा धाेका सर्वाधिक आहे. वनविभागाने शेतकऱ्यांसाठी याेग्य उपाययाेजना न केल्यास वनालगतची शेती पडिक राहण्याची शक्यता आहे.गडचिराेली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून वाघ, बिबट तसेच अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून मानवावर हल्ले हाेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. सुरुवातीला आरमाेरी व देसाईगंज तालुक्यात, त्यानंतर गडचिराेली तालुक्यात वाघांच्या हल्ल्यांनी कहरच केला.  २७ जानेवारी २०१९ पासून १४ मे २०२२ पर्यंत एकूण ३० लाेकांचा बळी वाघ व बिबट्यांनी घेतला. २०२२ मध्ये २० जानेवारी राेजी आरमाेरी तालुक्यातील कुरंझा येथील इसमाला वाघाने ठार केले तर याच वर्षी १३ व १४ मे राेजी अरसाेडा व आरमाेरी येथील महिला व पुरुषाला वाघाने त्याच्याच शेतात ठार केले. उन्हाळ्यात जंगल शुष्क असतानाही वाघाने लपूनछपून हल्ले केले. आता तर वनराई बहरली आहे. पेरणीपूर्व मशागतीला सुरुवातही झाली आहे. अशास्थितीत शेतकरी शेतात भीती मनात ठेवूनच जात आहेत. त्यातही ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलालगत आहे व त्याच परिसरात वाघाची दहशत आहे, अशा ठिकाणी जाण्यास शेतकरी धजावत नाही. मागील वर्षीसुद्धा बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी वाघाच्या दहशतीमुळे जंगलालगतची शेती पडिक ठेवली.

काेणकाेणत्या गावातील शेतकऱ्यांना धाेका?गडचिराेली व वडसा वनविभागातील शेतकऱ्यांना वाघाच्या हल्ल्याचा सर्वाधिक धाेका आहे.

-    गडचिराेली तालुक्यातील जेप्रा-दिभना परिसरातील पाच गावे,धुंडेशिवणी परिसर चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गाेगाव तसेच टेंभा चांभार्डा, मरेगाव, अमिर्झा कळमटाेला, आंबेटाेला, आंबेशिवणी, राजगाटा-    आरमाेरी तालुक्यातील सिर्सी, गणेशपूर, इंजेवारी, कुरंझा, देलाेडा, अरसाेडा तसेच कासवी परिसर देसाईगंज तालुक्यातील कुरूड, काेंढाळा, शिवराजपूर परिसर आदी गावांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक धाेका आहे.

आतापर्यंत किती बळी? गडचिराेली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात वाघ-बिबट्यांनी आतापर्यंत ३० लाेकांचा बळी घेतला. वाघांनी २५ लाेकांना ठार केले तर बिबट्यांनी ५ लाेकांचा बळी घेतला. बिबट बळींमध्ये  चंद्रपूर जिल्ह्यातील एका लहान मुलांचाही समावेश आहे. चालू वर्षात एकूण ५ बळी वाघांनी घेतले. यामध्ये आरमाेरी तालुक्यातील तीन तर देसाईगंज तालुक्यातील दाेघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चार पुरूष व एक महिला ठार झाली.

 

टॅग्स :FarmerशेतकरीTigerवाघ