शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

आतापर्यंत २४ हजार हेक्टरवर धान रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्या टाकत असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने एटापल्ली, भामरागड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करतात.

ठळक मुद्देअनियमित पाऊस । १,६८,४२० हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार जिल्ह्यात २४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावर धान रोवणी झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही काही परिसरात धान रोवणीलायक पाऊस झाला नसल्याने रोवण्यांच्या कामाला गती आली नाही.गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्या टाकत असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने एटापल्ली, भामरागड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करतात.१३ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रावर धानाचे पऱ्हे टाकण्यात आले आहेत. पऱ्हे टाकलेल्या शेतकऱ्यांनी धान रोवणीला सुरूवात केली आहे. मागील १५ दिवसांपासून रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. पावसाचे प्रमाण असमान आहे. काही भागात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे रोवणीची कामे सुरू झाली नाही. ज्या भागात पुरेसा पाऊस झाला त्या भागात मात्र रोवणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या आढाव्यानुसार २४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावर रोवणी आटोपली आहेत. प्रत्येक तालुक्यात जवळपास ३० ते ४० टक्केच रोवणीची कामे झाली आहेत.पुरेसा पाऊस झाला नसल्याने अजूनही तलाव, बोड्या अर्ध्याही भरल्या नाहीत. धानाचे पूर्ण उत्पादन होण्यासाठी तलाव व बोड्या पाण्याने पूर्ण भरणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.७०९ हेक्टरवर मक्याची लागवडजिल्ह्यातील हवामान, पर्जन्यमान व जमीन मका पिकासाठी लाभदायक असल्याने मका पिकाचे चांगले उत्पादन होते. कमी खर्चात मक्याचे उत्पादन घेता येणे शक्य होत असल्याने काही शेतकरी मका पिकाची लागवड करीत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच आधारभूत धान खरेदी केंद्रावर मक्याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे मक्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी मका पिकाच्या लागवडीकडे वळला आहे.सोयाबिन उत्पादक शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसून येते. सुमारे १३ हजार ९४३ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस