शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आतापर्यंत २४ हजार हेक्टरवर धान रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्या टाकत असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने एटापल्ली, भामरागड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करतात.

ठळक मुद्देअनियमित पाऊस । १,६८,४२० हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार जिल्ह्यात २४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावर धान रोवणी झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही काही परिसरात धान रोवणीलायक पाऊस झाला नसल्याने रोवण्यांच्या कामाला गती आली नाही.गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्या टाकत असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने एटापल्ली, भामरागड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करतात.१३ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रावर धानाचे पऱ्हे टाकण्यात आले आहेत. पऱ्हे टाकलेल्या शेतकऱ्यांनी धान रोवणीला सुरूवात केली आहे. मागील १५ दिवसांपासून रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. पावसाचे प्रमाण असमान आहे. काही भागात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे रोवणीची कामे सुरू झाली नाही. ज्या भागात पुरेसा पाऊस झाला त्या भागात मात्र रोवणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या आढाव्यानुसार २४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावर रोवणी आटोपली आहेत. प्रत्येक तालुक्यात जवळपास ३० ते ४० टक्केच रोवणीची कामे झाली आहेत.पुरेसा पाऊस झाला नसल्याने अजूनही तलाव, बोड्या अर्ध्याही भरल्या नाहीत. धानाचे पूर्ण उत्पादन होण्यासाठी तलाव व बोड्या पाण्याने पूर्ण भरणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.७०९ हेक्टरवर मक्याची लागवडजिल्ह्यातील हवामान, पर्जन्यमान व जमीन मका पिकासाठी लाभदायक असल्याने मका पिकाचे चांगले उत्पादन होते. कमी खर्चात मक्याचे उत्पादन घेता येणे शक्य होत असल्याने काही शेतकरी मका पिकाची लागवड करीत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच आधारभूत धान खरेदी केंद्रावर मक्याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे मक्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी मका पिकाच्या लागवडीकडे वळला आहे.सोयाबिन उत्पादक शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसून येते. सुमारे १३ हजार ९४३ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस