शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आतापर्यंत २४ हजार हेक्टरवर धान रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्या टाकत असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने एटापल्ली, भामरागड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करतात.

ठळक मुद्देअनियमित पाऊस । १,६८,४२० हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार जिल्ह्यात २४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावर धान रोवणी झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही काही परिसरात धान रोवणीलायक पाऊस झाला नसल्याने रोवण्यांच्या कामाला गती आली नाही.गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्या टाकत असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने एटापल्ली, भामरागड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करतात.१३ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रावर धानाचे पऱ्हे टाकण्यात आले आहेत. पऱ्हे टाकलेल्या शेतकऱ्यांनी धान रोवणीला सुरूवात केली आहे. मागील १५ दिवसांपासून रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. पावसाचे प्रमाण असमान आहे. काही भागात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे रोवणीची कामे सुरू झाली नाही. ज्या भागात पुरेसा पाऊस झाला त्या भागात मात्र रोवणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या आढाव्यानुसार २४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावर रोवणी आटोपली आहेत. प्रत्येक तालुक्यात जवळपास ३० ते ४० टक्केच रोवणीची कामे झाली आहेत.पुरेसा पाऊस झाला नसल्याने अजूनही तलाव, बोड्या अर्ध्याही भरल्या नाहीत. धानाचे पूर्ण उत्पादन होण्यासाठी तलाव व बोड्या पाण्याने पूर्ण भरणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.७०९ हेक्टरवर मक्याची लागवडजिल्ह्यातील हवामान, पर्जन्यमान व जमीन मका पिकासाठी लाभदायक असल्याने मका पिकाचे चांगले उत्पादन होते. कमी खर्चात मक्याचे उत्पादन घेता येणे शक्य होत असल्याने काही शेतकरी मका पिकाची लागवड करीत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच आधारभूत धान खरेदी केंद्रावर मक्याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे मक्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी मका पिकाच्या लागवडीकडे वळला आहे.सोयाबिन उत्पादक शेतकरी आता कापूस पिकाकडे वळला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसून येते. सुमारे १३ हजार ९४३ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस