शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

आतापर्यंत ३१ रूग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

गडचिरोली शहरातील गांधी वार्डातील पती-पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्याच कुटुंबातील एकाचा अहवाल रविवारी निगेटीव्ह आला होता. मात्र पुन्हा तपासणी केली असता, त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देसोमवारी चार जण कोरोनामुक्त : जिल्हाभरात ४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्येत सोमवारी (दि.८) आणखी एकाची भर पडली. मात्र त्याचवेळी ४ जण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे कोरोनापासून मुक्त झालेल्या नागरिकांची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे. सोमवारी एका रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. त्यात अ‍ॅक्टिव रूग्ण केवळ १२ आहेत.आतापर्यंत जिल्हाभरातील ३ हजार ४८ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ३ हजार ४ नमुने निगेटीव्ह आले आहेत. तीन नमुन्यांचा अहवाल येणे शिल्लक आहे. सहा ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. सध्या १५७ नागरिक विलगीकरण कक्षात आहेत.गडचिरोली शहरातील गांधी वार्डातील पती-पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्याच कुटुंबातील एकाचा अहवाल रविवारी निगेटीव्ह आला होता. मात्र पुन्हा तपासणी केली असता, त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण ठेवण्यात आले आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या चार जणांमध्ये मुलचेरा तालुक्यातील दोन, कुरखेडा व अहेरी येथील एकाचा समावेश आहे.कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांचा रोषसिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्टपेठा येथील वयोवृध्द नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्याला हैदराबाद येथे दवाखाण्यात भरती करण्यासाठी सिरोंचा येथील वार्ड क्रमांक ७ मधील वाहनचालक वाहन घेऊन गेला होता. वयोवृध्द नागरिकाचा कोरोना अहवाल ३१ मे ला पॉझिटीव्ह आल्यापासून संबंधित वार्डाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करून सदर वार्ड सील करण्यात आला. मागील नऊ दिवसांपासून या वार्डातील नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरचे राशन, भाजीपाला व अन्य साहित्य संपत आले आहेत. यामुळे महिला व नागरिक चांगलेच संतापले. त्यांनी पोलीस विभागाने लावलेल्या बॅरेकजवळ गोळा होऊन प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. ही माहिती नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील व पोलीस निरिक्षक अजय अहीरकर यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी नागरिकांची समजून काढली. तसेच भाजीपाला, किराणा, रेशन व अन्य साहित्य गेटजवळ उपलब्ध करून दिले.देसाईगंज कोरोनामुक्त कसे?देसाईगंज हे गडचिरोली शहरानंतरचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. या तालुक्याच्या सीमा भंडारा जिल्ह्याला लागून आहेत. जिल्ह्यातील एकमेव व्यापारी शहर म्हणून देसाईगंजमध्ये जिल्ह्यातील आणि लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांची वर्दळ असते. या शहरातील अनेक नागरिक देश, विदेशात राहतात. कोरोनामुळे ते देसाईगंज शहरात परत आले आहेत. मात्र अजूनपर्यंत देसाईगंज शहरातील एकही नागरिक कोरोनाबाधीत आढळून आलेला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असू शकतो, मात्र ते याबाबतची माहिती लपवत तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. यादृष्टीने तालुका प्रशासनाने अधिक सतर्क राहून चौकशी करण्याची गरज आहे.मास्क लावून नागरिक बिनधास्त१८ मे रोजी जिल्ह्यातील पहिला कोरोनाचा रूग्ण आढळून आला. त्यानंतर रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्याचबरोबर बरे होणाºया रूग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाविषयी असलेली भिती कमी होत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता. त्यावेळी जेवढी भिती होती, त्यापेक्षा आता भिती कमी झाली आहे. मास्क घालून नागरिक बिनधास्त आपली कामे करीत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश कामे सुरू झाल्याने आता अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या