शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा: मुंबई हायकोर्ट
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
6
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
7
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
8
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
9
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
10
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
11
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
12
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
13
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
14
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
15
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
16
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
17
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
18
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
19
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
20
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?

सर्पदंशाने वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:47 IST

चामोर्शी तालुक्यातील वायगाव (येनापूर) येथील समता मागासवर्गीय वसतिगृहात राहून वायगाव येथीलच डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देवायगाव येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी (जि.गडचिरोली) : चामोर्शी तालुक्यातील वायगाव (येनापूर) येथील समता मागासवर्गीय वसतिगृहात राहून वायगाव येथीलच डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. एक विद्यार्थी चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असून इयत्ता दहावीचा विद्यार्थी धम्मदीप सुनील रामटेके (१६) रा. येल्ला याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.रितिक घनश्याम गुडी (१५) रा. पानोरा पो. धामनगाव ता. गोंडपिपरी व अतुल संजय कुद्रपवार (१५) रा. पानोरा ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. रितिक गुडी व अतुल कुद्रपवार या दोघांना रात्री गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर रात्री १.४५ वाजता रितिक गुडी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. काही वेळातच अतुल कुद्रपवार याचाही मृत्यू झाला. रुग्णालयात आणल्यावर अतुल हा मृतावस्थेतच होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तर धम्मदीप सुनील रामटेके रा. येला ता. मुलचेरा या विद्यार्थ्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. वायगाव येथे मिलींद ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था नवरगाव ता. सिंदेवाहीद्वारा संचालित मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात २४ मुले निवासी राहतात. हे विद्यार्थी डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी कळताच पालकांनी रूग्णालयात धाव घेतली. या घटनेसंदर्भात गडचिरोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या या दोन्ही विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज येथील वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. मात्र मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. या घटनेने सामाजिक विभागासह शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.वसतिगृहात सोयीसुविधांचा अभावगेल्या २५ वर्षांपासून हे वसतिगृह सुरु असून या वसतिगृहात अद्यापही बेडची व्यवस्था नाही. सदर वसतिगृहाची इमारतही जुनी व कौलारू आहे. या वसतिगृहात केवळ दोन खोल्या आहेत. शौचालय व बाथरूमची व्यवस्था आहे. मात्र या वसतिगृहाला संरक्षण भिंत नाही. बेड नसल्याने येथील विद्यार्थी खाली गादीवर झोपतात. शासनाच्या निकषानुसार या वसतिगृहात सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत असते. मात्र या वसतिगृहाकडे सामाजिक न्याय विभागाचे तसेच संस्थेचे दुर्लक्ष होत आहे.सखोल चौकशी करावसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सदर मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून पालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे व मृतक विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.