शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाने वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:47 IST

चामोर्शी तालुक्यातील वायगाव (येनापूर) येथील समता मागासवर्गीय वसतिगृहात राहून वायगाव येथीलच डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देवायगाव येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी (जि.गडचिरोली) : चामोर्शी तालुक्यातील वायगाव (येनापूर) येथील समता मागासवर्गीय वसतिगृहात राहून वायगाव येथीलच डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. एक विद्यार्थी चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असून इयत्ता दहावीचा विद्यार्थी धम्मदीप सुनील रामटेके (१६) रा. येल्ला याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.रितिक घनश्याम गुडी (१५) रा. पानोरा पो. धामनगाव ता. गोंडपिपरी व अतुल संजय कुद्रपवार (१५) रा. पानोरा ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. रितिक गुडी व अतुल कुद्रपवार या दोघांना रात्री गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर रात्री १.४५ वाजता रितिक गुडी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. काही वेळातच अतुल कुद्रपवार याचाही मृत्यू झाला. रुग्णालयात आणल्यावर अतुल हा मृतावस्थेतच होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तर धम्मदीप सुनील रामटेके रा. येला ता. मुलचेरा या विद्यार्थ्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. वायगाव येथे मिलींद ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था नवरगाव ता. सिंदेवाहीद्वारा संचालित मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात २४ मुले निवासी राहतात. हे विद्यार्थी डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी कळताच पालकांनी रूग्णालयात धाव घेतली. या घटनेसंदर्भात गडचिरोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या या दोन्ही विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज येथील वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. मात्र मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. या घटनेने सामाजिक विभागासह शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.वसतिगृहात सोयीसुविधांचा अभावगेल्या २५ वर्षांपासून हे वसतिगृह सुरु असून या वसतिगृहात अद्यापही बेडची व्यवस्था नाही. सदर वसतिगृहाची इमारतही जुनी व कौलारू आहे. या वसतिगृहात केवळ दोन खोल्या आहेत. शौचालय व बाथरूमची व्यवस्था आहे. मात्र या वसतिगृहाला संरक्षण भिंत नाही. बेड नसल्याने येथील विद्यार्थी खाली गादीवर झोपतात. शासनाच्या निकषानुसार या वसतिगृहात सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत असते. मात्र या वसतिगृहाकडे सामाजिक न्याय विभागाचे तसेच संस्थेचे दुर्लक्ष होत आहे.सखोल चौकशी करावसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सदर मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून पालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे व मृतक विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.