शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

सर्पदंशाने वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:47 IST

चामोर्शी तालुक्यातील वायगाव (येनापूर) येथील समता मागासवर्गीय वसतिगृहात राहून वायगाव येथीलच डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देवायगाव येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी (जि.गडचिरोली) : चामोर्शी तालुक्यातील वायगाव (येनापूर) येथील समता मागासवर्गीय वसतिगृहात राहून वायगाव येथीलच डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. एक विद्यार्थी चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असून इयत्ता दहावीचा विद्यार्थी धम्मदीप सुनील रामटेके (१६) रा. येल्ला याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.रितिक घनश्याम गुडी (१५) रा. पानोरा पो. धामनगाव ता. गोंडपिपरी व अतुल संजय कुद्रपवार (१५) रा. पानोरा ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. रितिक गुडी व अतुल कुद्रपवार या दोघांना रात्री गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर रात्री १.४५ वाजता रितिक गुडी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. काही वेळातच अतुल कुद्रपवार याचाही मृत्यू झाला. रुग्णालयात आणल्यावर अतुल हा मृतावस्थेतच होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तर धम्मदीप सुनील रामटेके रा. येला ता. मुलचेरा या विद्यार्थ्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. वायगाव येथे मिलींद ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था नवरगाव ता. सिंदेवाहीद्वारा संचालित मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात २४ मुले निवासी राहतात. हे विद्यार्थी डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी कळताच पालकांनी रूग्णालयात धाव घेतली. या घटनेसंदर्भात गडचिरोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या या दोन्ही विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज येथील वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. मात्र मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. या घटनेने सामाजिक विभागासह शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.वसतिगृहात सोयीसुविधांचा अभावगेल्या २५ वर्षांपासून हे वसतिगृह सुरु असून या वसतिगृहात अद्यापही बेडची व्यवस्था नाही. सदर वसतिगृहाची इमारतही जुनी व कौलारू आहे. या वसतिगृहात केवळ दोन खोल्या आहेत. शौचालय व बाथरूमची व्यवस्था आहे. मात्र या वसतिगृहाला संरक्षण भिंत नाही. बेड नसल्याने येथील विद्यार्थी खाली गादीवर झोपतात. शासनाच्या निकषानुसार या वसतिगृहात सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत असते. मात्र या वसतिगृहाकडे सामाजिक न्याय विभागाचे तसेच संस्थेचे दुर्लक्ष होत आहे.सखोल चौकशी करावसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सदर मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून पालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे व मृतक विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.