शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

घरकुलांची गती संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:43 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८ -१९ या तीन वर्षात जिल्हाभरातील १० हजार ३३२ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाची गती अतिशय संथ असल्याने मागील तीन वर्षात केवळ २ हजार ७६० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना : तीन वर्षात १० हजार कुटुंबांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८ -१९ या तीन वर्षात जिल्हाभरातील १० हजार ३३२ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाची गती अतिशय संथ असल्याने मागील तीन वर्षात केवळ २ हजार ७६० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.प्रधानमंत्री आवास योजना ही पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घर उपलब्ध करून देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २४ हजार लाभार्थी आहेत. टप्प्याटप्प्याने घरकूल उपलब्ध करून दिले जात आहेत. मागील तीन वर्षात सुमारे १० हजार ३३२ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. घरकूल मंजूर झाल्यानंतर अगदी काही दिवसातच पहिला हप्ता मंजूर केला जातो. या रकमेतून लाभार्थ्याने घरकूलाच्या बांधकामाला सुरूवात करावी, अशी अपेक्षा राहते. मात्र बरेच लाभार्थी घरकूलाचा पैसा इतर कामावर खर्च करतात. परिणामी पहिल्या हप्त्यातून पायव्याचेही बांधकाम होत नसल्याचे बऱ्याचवेळा दिसून येते. मागील तीन वर्षात सुमारे ९ हजार २९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याच्या निधीनुसार बांधकाम झाल्यानंतर दुसरा हप्ता दिला जातो.दुसºया हप्त्यानंतर तिसरा व अंतिम हप्ता म्हणून चवथा हप्ता दिला जातो. घराचे पूर्ण निरिक्षण केल्याशिवाय चवथा हप्ता दिला जात नाही. एकूण १० हजार लाभार्थ्यांपैकी केवळ ५ हजार ७१४ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, ४ हजार १६ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता व १ हजार ४१३ लाभार्थ्यांना चवथा हप्ता देण्यात आला आहे. तर ९ हजार ४७ घरकुलांच्या बांधकामाला अजुनही सुरूवात झाली नसल्याचे दिसून येते.निम्म्याहून अधिक लाभार्थी प्रतीक्षेत२०२२ पर्यंत सर्वांना घर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २४ हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी केवळ १० हजार लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून देण्यात आले आहे. आणखी १४ हजार लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. दोन वर्षात उर्वरित लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध होणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर ‘ड’ यादीत नवीन लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केली जात आहेत. यामध्ये जवळपास ४० ते ५० हजार लाभार्थी राहणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून द्यायचे असेल तर दरवर्षी घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट १० हजारांच्या जवळपास असणे आवश्यक आहे. मात्र केंद्र शासन दरवर्षी दीड ते दोन हजार घरकूल मंजूर करीत आहे. या गतीने घरकुलांचे बांधकाम झाल्यास २०३० पर्यंत सुध्दा सर्व नागरिकांना घरकूल उपलब्ध होणार नाही.

टॅग्स :government schemeसरकारी योजना