शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जिल्ह्यातून ‘जय विदर्भ’चा नारा गुंजणार

By admin | Updated: November 13, 2014 23:01 IST

महाराष्ट्रात सर्वात मागास व विकासातही सर्वात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला आता स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली

ए. आर. खान - अहेरीमहाराष्ट्रात सर्वात मागास व विकासातही सर्वात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला आता स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली नसल्याने दुर्गम भागातील जनतेसह जिल्ह्यातील विदर्भवादी नेत्यांना आता स्वतंत्र विदर्भ राज्य होईल, अशी मोठी आशा वाटू लागली आहे. त्यामुळेच आगामी नागपूर अधिवेशनाच्या काळात अहेरी उपविभागातून पुन्हा जय विदर्भाचा नारा गुंजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले. या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या भरवशावर हा भाग समृद्ध होऊ शकला असता, परंतु राज्य सरकारची उदासीनता याला कारणीभूत ठरली. पश्चिम महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी कायम विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यावरही अन्याय करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे नक्षलवादासारख्या गंभीर प्रश्न या भागात वाढीस लागला. सिंचनाची कोणतीही सुविधा निर्माण झाली नाही. ज्या जनतेने जंगल राखला, तोच जंगल विकासासाठी अडसर ठरला. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही, ही भावना आता गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. या भावनेतूनच गडचिरोलीसह विदर्भातून भारतीय जनता पक्षाला ४४ जागा निवडणुकीत विधानसभेत मिळाल्या. भारतीय जनता पक्षाचा मागील २५ वर्षांपासून मित्र असलेला शिवसेना विदर्भ राज्याचा कायम विरोधक राहिला. मात्र बुधवारी झालेल्या विश्वास मत प्रस्तावानंतर शिवसेनेशी असलेले नाते पूर्णपणे संपुष्टात आले. आता भाजपला विदर्भ राज्य देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका विदर्भ राज्याबाबत अनुकूल नसली तरी पक्षातील विदर्भवादी नेते मात्र स्वतंत्र राज्यासाठी कंबर कसून आहे. नाग विदर्भ आंदोलन समितीनेही भाजपसोबत याच मागणीला घेऊन आघाडी केली आहे. स्वत: नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज भाजपचे आमदार आहे. त्यामुळे आगामी नागपूर अधिवेशनाच्या काळात पुन्हा स्वतंत्र विदर्भाचा नारा गडचिरोली जिल्ह्यात गुंजणार आहे, असे चित्र दिसून येत आहे.