शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

जिल्ह्यातून ‘जय विदर्भ’चा नारा गुंजणार

By admin | Updated: November 13, 2014 23:01 IST

महाराष्ट्रात सर्वात मागास व विकासातही सर्वात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला आता स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली

ए. आर. खान - अहेरीमहाराष्ट्रात सर्वात मागास व विकासातही सर्वात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला आता स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली नसल्याने दुर्गम भागातील जनतेसह जिल्ह्यातील विदर्भवादी नेत्यांना आता स्वतंत्र विदर्भ राज्य होईल, अशी मोठी आशा वाटू लागली आहे. त्यामुळेच आगामी नागपूर अधिवेशनाच्या काळात अहेरी उपविभागातून पुन्हा जय विदर्भाचा नारा गुंजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले. या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या भरवशावर हा भाग समृद्ध होऊ शकला असता, परंतु राज्य सरकारची उदासीनता याला कारणीभूत ठरली. पश्चिम महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी कायम विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यावरही अन्याय करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे नक्षलवादासारख्या गंभीर प्रश्न या भागात वाढीस लागला. सिंचनाची कोणतीही सुविधा निर्माण झाली नाही. ज्या जनतेने जंगल राखला, तोच जंगल विकासासाठी अडसर ठरला. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही, ही भावना आता गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. या भावनेतूनच गडचिरोलीसह विदर्भातून भारतीय जनता पक्षाला ४४ जागा निवडणुकीत विधानसभेत मिळाल्या. भारतीय जनता पक्षाचा मागील २५ वर्षांपासून मित्र असलेला शिवसेना विदर्भ राज्याचा कायम विरोधक राहिला. मात्र बुधवारी झालेल्या विश्वास मत प्रस्तावानंतर शिवसेनेशी असलेले नाते पूर्णपणे संपुष्टात आले. आता भाजपला विदर्भ राज्य देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका विदर्भ राज्याबाबत अनुकूल नसली तरी पक्षातील विदर्भवादी नेते मात्र स्वतंत्र राज्यासाठी कंबर कसून आहे. नाग विदर्भ आंदोलन समितीनेही भाजपसोबत याच मागणीला घेऊन आघाडी केली आहे. स्वत: नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज भाजपचे आमदार आहे. त्यामुळे आगामी नागपूर अधिवेशनाच्या काळात पुन्हा स्वतंत्र विदर्भाचा नारा गडचिरोली जिल्ह्यात गुंजणार आहे, असे चित्र दिसून येत आहे.