शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

वीज टॉवरच्या उभारणीसाठी मौल्यवान झाडांची कत्तल

By admin | Updated: October 16, 2016 00:58 IST

चंद्रपूरवरून छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे जाणाऱ्या वीज टॉवर उभारणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व कोरची ..

रेडिएशनचा त्रास वाढणार : शेकडो हेक्टरवरील जंगल धोक्यातकोरची : चंद्रपूरवरून छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे जाणाऱ्या वीज टॉवर उभारणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील मौल्यवान झाडांची कत्तल केली जात आहे. यामध्ये कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी कोरची तालुक्यातून तीन समांतर वीज टॉवर लाईन गेली आहे. त्याच्या बाजुला आणखी एक लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही लाईन जेथून जात आहे, त्या लाईनमधून ५०० ते ७०० मीटर रूंदीच्या पट्ट्यातील झाडांची तोड केली जात आहे. पुन्हा दोन ते तीन लाईन या ठिकाणावरूनच जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून सांगितली जात आहे. सहा ते सात समांतर लाईन गेल्यास दोन किमी रूंदीच्या पट्ट्यातील संपूर्ण झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. यामुळे या परिसरातील ३० टक्के वनसंपदा नष्ट होण्याचा धोका आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे काम जंगल तोडीला परवानगी न मिळाल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. त्याचबरोबर नवीन प्रकल्प, रस्ते, तलाव, विद्युतची कामेसुद्धा रखडली आहेत. मात्र वीज लाईन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी शेकडो किमी अंतरावरील वनसंपदा तोडली जात आहे. याला परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न कोरची तालुक्यातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार दिले असल्याचे सांगितले जात असले तरी एकाही गावाच्या ग्रामसभेची परवानगी घेण्यात आली नाही. अनेक गावांचा या टॉवर लाईनला विरोध असतानाही स्थानिक आदिवासींवर दबाव टाकून काम पुढे रेटले जात आहे. या टॉवर लाईनमुळे हजारो कुटुंब भूमीहीन होण्याची शक्यता आहे. सदर टॉवर लाईनमधून ११ हजार मेगावॅट विद्युत प्रवाह राहणार असून येथील रेडिएशनचा धोका परिसरातील मानव व इतर प्राण्यांनाही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)