शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

प्रमुख सहा मार्ग अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच सखल भागातील शेतजमिनीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे धानपीक व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. छत्तीसगड राज्या झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला दाब निर्माण होऊन या नदीचे पाणी भामरागडात शिरले आहे.

ठळक मुद्देपाण्याचा जोर सुरूच : गोदावरी, इंद्रावती नदीकाठच्या गावांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गुरूवारी दुपारपासून गडचिरोलीसह जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सहा मार्ग बंदच आहेत. पर्लकोटा नदीच्या पाण्याचा वेढा भामरागडला कायम आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच सखल भागातील शेतजमिनीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे धानपीक व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. छत्तीसगड राज्या झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला दाब निर्माण होऊन या नदीचे पाणी भामरागडात शिरले आहे. इंद्रावती, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गोसेखुर्द धरणाचे २५ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. वर्धा, वैनगंगा, प्राणहिता नद्यांच्या पाण्याची पातळी धोकापातळीच्या खाली आहे. कालेश्वरम केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. मेडिगड्डा बॅरेजचे ६५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठावरील गावकऱ्यांना सावध करण्यात आले आहे.जगदलपूर, चिंदनार, पातागुडम केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. मानापूर केंद्रावरील नोंदीनुसार पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सामान्य आहे. मात्र इंद्रावती नदीच्या बॅक वॉटरमुळे पर्लकोटा नदी फुगली आहे.पर्लकोटाच्या पुलावरून जवळपास दोन मीटर पाणी वाहात आहे. पुन्हा पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भामरागडमधील जवळपास ५० घरे व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना दुसरीकडे हलविण्यात आले.नाल्यात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यूकमलापूर - वेडमपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या अर्कापल्ली येथील नरेश सिंगा सडमेक (३५) हा शेतकरी बुधवारी सायंकाळच्या सुमारास शेतातून गावाकडे परत येत असताना नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. नरेश हा बुधवारी शेतावर गेला होता. दरम्यान दिवसभर कमलापूर परिसरात दमदार पाऊस झाल्याने नाल्याचे पाणी वाढले. त्या पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना प्रवाह अधिक असल्याने वाहून गेला.पुरामुळे हे मार्ग आहेत बंदर्पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी असल्याने आलापल्ली-भामरागड हा मार्ग बंद आहे. आलापल्ली ते हेमलकसा दरम्यान अनेक लहान-मोठे नदी, नाले आहेत. याही नाल्यांवर पाणी आहे. सोमनपल्ली नाल्यावरील पुलावर पाणी असल्याने आसरअल्ली-सोमनपल्ली मार्ग बंद आहे. अमराजी नाल्याच्या पाण्यामुळे आलापल्ली-सिरोंचा, कोरेतोगू नाल्यामुळे रोमपल्ली-झिंगानूर, पीडमिली नाल्यामुळे हेमलकसा-करमपल्ली-सुरजागड मार्ग बंद आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर