शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

प्रमुख सहा मार्ग अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच सखल भागातील शेतजमिनीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे धानपीक व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. छत्तीसगड राज्या झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला दाब निर्माण होऊन या नदीचे पाणी भामरागडात शिरले आहे.

ठळक मुद्देपाण्याचा जोर सुरूच : गोदावरी, इंद्रावती नदीकाठच्या गावांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गुरूवारी दुपारपासून गडचिरोलीसह जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सहा मार्ग बंदच आहेत. पर्लकोटा नदीच्या पाण्याचा वेढा भामरागडला कायम आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच सखल भागातील शेतजमिनीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे धानपीक व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. छत्तीसगड राज्या झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला दाब निर्माण होऊन या नदीचे पाणी भामरागडात शिरले आहे. इंद्रावती, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गोसेखुर्द धरणाचे २५ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. वर्धा, वैनगंगा, प्राणहिता नद्यांच्या पाण्याची पातळी धोकापातळीच्या खाली आहे. कालेश्वरम केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. मेडिगड्डा बॅरेजचे ६५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठावरील गावकऱ्यांना सावध करण्यात आले आहे.जगदलपूर, चिंदनार, पातागुडम केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. मानापूर केंद्रावरील नोंदीनुसार पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सामान्य आहे. मात्र इंद्रावती नदीच्या बॅक वॉटरमुळे पर्लकोटा नदी फुगली आहे.पर्लकोटाच्या पुलावरून जवळपास दोन मीटर पाणी वाहात आहे. पुन्हा पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भामरागडमधील जवळपास ५० घरे व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना दुसरीकडे हलविण्यात आले.नाल्यात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यूकमलापूर - वेडमपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या अर्कापल्ली येथील नरेश सिंगा सडमेक (३५) हा शेतकरी बुधवारी सायंकाळच्या सुमारास शेतातून गावाकडे परत येत असताना नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. नरेश हा बुधवारी शेतावर गेला होता. दरम्यान दिवसभर कमलापूर परिसरात दमदार पाऊस झाल्याने नाल्याचे पाणी वाढले. त्या पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना प्रवाह अधिक असल्याने वाहून गेला.पुरामुळे हे मार्ग आहेत बंदर्पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी असल्याने आलापल्ली-भामरागड हा मार्ग बंद आहे. आलापल्ली ते हेमलकसा दरम्यान अनेक लहान-मोठे नदी, नाले आहेत. याही नाल्यांवर पाणी आहे. सोमनपल्ली नाल्यावरील पुलावर पाणी असल्याने आसरअल्ली-सोमनपल्ली मार्ग बंद आहे. अमराजी नाल्याच्या पाण्यामुळे आलापल्ली-सिरोंचा, कोरेतोगू नाल्यामुळे रोमपल्ली-झिंगानूर, पीडमिली नाल्यामुळे हेमलकसा-करमपल्ली-सुरजागड मार्ग बंद आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर