शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या सिरोंचा, भामरागड, अहेरी तालुक्यात पूरस्थिती कायम; बहुतांश मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 11:20 IST

गडचिरोलीच्या ११ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, पुन्हा तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

गडचिरोली : जिल्ह्यात सुमारे दीड आठवड्यापासून थैमान घालत असलेल्या पावसाने दोन दिवस थोडी उसंत घेतल्यानंतर रविवारी पुन्हा जोरदार मुसंडी मारली. सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्हाभरात सरासरी १०७.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. गोसेखुर्द आणि मेडीगड्डामधील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आदी नद्यांसह उपनद्यांचे पाणी लगतच्या शेतांसह गावांमध्ये शिरले आहे. यासोबत अनेक ठेंगणे पूलही पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यात काही प्रमुख मार्गावरील वाहतूकही वारंवार खंडित होत आहे.

सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता पाण्याला उतरती कळा लागली असली तरी जिकडे-तिकडे अजूनही पाणी आणि गाळ साचलेला आहे. ज्या गावांना पाण्याचा वेढा पडला तेथील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी आश्रय दिला असून आता ते लोक हळूहळू आपापल्या गावी परतू लागले आहेत. भामरागड, अहेरी तालुक्यांत अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने तीन दिवस पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सोमवार ते बुधवार असे तीन दिवस जिल्हाभरातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.

एनडीआरएफचे पथकही जिल्ह्यात दाखल

दरम्यान, पूरग्रस्त नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य आणि जिल्हा आपत्ती निवारण पथकाच्या मदतीला दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकही (एनडीआरएफ) जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकांनी अनेक ठिकाणी गर्भवती महिला, बाळंत महिलांसह रुग्णांना मोटारबोटच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मदत केली.

शेतीचे सर्वाधिक नुकसान

जलाशयांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शेतजमिनीचे आणि पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६ लोकांचा बळी गेला आहे, तर अनेक जनावरेही दगावली आहेत. कच्च्या घरांचीही पडझड झाली आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरGadchiroliगडचिरोली