शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गडचिरोलीच्या सिरोंचा, भामरागड, अहेरी तालुक्यात पूरस्थिती कायम; बहुतांश मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 11:20 IST

गडचिरोलीच्या ११ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, पुन्हा तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

गडचिरोली : जिल्ह्यात सुमारे दीड आठवड्यापासून थैमान घालत असलेल्या पावसाने दोन दिवस थोडी उसंत घेतल्यानंतर रविवारी पुन्हा जोरदार मुसंडी मारली. सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्हाभरात सरासरी १०७.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. गोसेखुर्द आणि मेडीगड्डामधील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आदी नद्यांसह उपनद्यांचे पाणी लगतच्या शेतांसह गावांमध्ये शिरले आहे. यासोबत अनेक ठेंगणे पूलही पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यात काही प्रमुख मार्गावरील वाहतूकही वारंवार खंडित होत आहे.

सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता पाण्याला उतरती कळा लागली असली तरी जिकडे-तिकडे अजूनही पाणी आणि गाळ साचलेला आहे. ज्या गावांना पाण्याचा वेढा पडला तेथील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी आश्रय दिला असून आता ते लोक हळूहळू आपापल्या गावी परतू लागले आहेत. भामरागड, अहेरी तालुक्यांत अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने तीन दिवस पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सोमवार ते बुधवार असे तीन दिवस जिल्हाभरातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.

एनडीआरएफचे पथकही जिल्ह्यात दाखल

दरम्यान, पूरग्रस्त नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य आणि जिल्हा आपत्ती निवारण पथकाच्या मदतीला दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकही (एनडीआरएफ) जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकांनी अनेक ठिकाणी गर्भवती महिला, बाळंत महिलांसह रुग्णांना मोटारबोटच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मदत केली.

शेतीचे सर्वाधिक नुकसान

जलाशयांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शेतजमिनीचे आणि पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६ लोकांचा बळी गेला आहे, तर अनेक जनावरेही दगावली आहेत. कच्च्या घरांचीही पडझड झाली आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरGadchiroliगडचिरोली