शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गडचिरोलीच्या सिरोंचा, भामरागड, अहेरी तालुक्यात पूरस्थिती कायम; बहुतांश मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 11:20 IST

गडचिरोलीच्या ११ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, पुन्हा तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

गडचिरोली : जिल्ह्यात सुमारे दीड आठवड्यापासून थैमान घालत असलेल्या पावसाने दोन दिवस थोडी उसंत घेतल्यानंतर रविवारी पुन्हा जोरदार मुसंडी मारली. सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्हाभरात सरासरी १०७.८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. गोसेखुर्द आणि मेडीगड्डामधील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आदी नद्यांसह उपनद्यांचे पाणी लगतच्या शेतांसह गावांमध्ये शिरले आहे. यासोबत अनेक ठेंगणे पूलही पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यात काही प्रमुख मार्गावरील वाहतूकही वारंवार खंडित होत आहे.

सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता पाण्याला उतरती कळा लागली असली तरी जिकडे-तिकडे अजूनही पाणी आणि गाळ साचलेला आहे. ज्या गावांना पाण्याचा वेढा पडला तेथील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी आश्रय दिला असून आता ते लोक हळूहळू आपापल्या गावी परतू लागले आहेत. भामरागड, अहेरी तालुक्यांत अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने तीन दिवस पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सोमवार ते बुधवार असे तीन दिवस जिल्हाभरातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.

एनडीआरएफचे पथकही जिल्ह्यात दाखल

दरम्यान, पूरग्रस्त नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य आणि जिल्हा आपत्ती निवारण पथकाच्या मदतीला दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकही (एनडीआरएफ) जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकांनी अनेक ठिकाणी गर्भवती महिला, बाळंत महिलांसह रुग्णांना मोटारबोटच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मदत केली.

शेतीचे सर्वाधिक नुकसान

जलाशयांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शेतजमिनीचे आणि पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६ लोकांचा बळी गेला आहे, तर अनेक जनावरेही दगावली आहेत. कच्च्या घरांचीही पडझड झाली आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरGadchiroliगडचिरोली