शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

जिल्ह्यात मदतीसाठी अवतरणार ‘सिंघम’; अवघ्या १० मिनिटात पोहोचतील पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:39 IST

गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भाग, चांगल्या रस्त्यांची अडचण आणि नक्षली कारवायांमुळे ही योजना राबविताना पोलीस विभागाला अनेक अडचणींना तोंड द्यावे ...

गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भाग, चांगल्या रस्त्यांची अडचण आणि नक्षली कारवायांमुळे ही योजना राबविताना पोलीस विभागाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते; पण तरीही पोलीस विभाग ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तयारीला लागला आहे. नक्षली प्रादुर्भाव नसणाऱ्या देसाईगंज ते चामोर्शी तालुक्यापर्यंतच्या पट्ट्यात या योजनेचा चांगला लाभ नागरिकांना मिळू शकेल.

(बॉक्स)

कॉल येताच कळणार लोकेशन

११२ नंबरवर एखाद्याने मोबाइल किंवा कोणत्याही संपर्क माध्यमातून फोन केल्यास तो कॉल मुंबई किंवा नागपूर येथे असणाऱ्या दोन राज्यस्तरीय कंट्रोल रूममध्ये जाईल. कॉल कुठून आला, त्याचे ठिकाणही तेथील यंत्रणेला लगेच कळू शकेल. त्यानंतर तो कॉल लगेच संबंधित जिल्ह्याच्या या कामासाठी बनविलेल्या विशेष कंट्रोल रूममध्ये जाईल. तेथून तक्रारीच्या स्वरूपानुसार विशेष वाहनाने पोलीस पथक संबंधित व्यक्तीच्या मदतीसाठी पोहोचू शकेल.

मदतीसाठी डायल करावा लागेल ११२

- आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत हवी असल्यास ११२ नंबर डायल करायचा आहे. शहरी भागात १० मिनिटातच पोलीस मदतीला धावून येतील.

- जिल्हा पोलीस दलात त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. जिल्हा मुख्यालयी असणाऱ्या कंट्रोल रूममधून त्याचे सूत्रसंचालन होईल.

५४ चारचाकी, १०० दुचाकी...

या विशेष सुविधेसाठी जिल्ह्यात ५४ चारचाकी वाहने आणि १०० दुचाकी वाहनांची गरज भासणार आहे. ही वाहने जीपीएस यंत्रणेसह विविध सुविधांनी सुसज्ज राहतील. त्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांकडे संपर्क व लोकेशन शोधण्यासाठी तसेच कंट्रोल रूमकडून येणारे संदेश पाहण्याासाठी टॅबलेट राहील. सध्या फक्त १३ बोलेरो वाहने उपलब्ध झाली आहेत.

कोरोनामुळे अडले प्रशिक्षण

११२ हेल्पलाइनसाठी ३०० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार. सध्या कोरोनामुळे हे प्रशिक्षण अडले असून, ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे वायरलेस विभागाचे पोलीस निरीक्षक के.आर.बाराभाई यांनी सांगितले.

कोट

ही हेल्पलाइन कार्यान्वित करण्यासाठी सेटअप लावणे सुरू आहे. याची अंमलबजावणी कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने करता येईल, हे तपासले जाईल, पण सध्या संपूर्ण जिल्हा या सेवेत कव्हर होईल, या दृष्टिने तांत्रिक तयारी केली जात आहे.

- अंकित गोयल

पोलीस अधीक्षक, गडचिरोली.