शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

चार दिवसात टप्प्याटप्प्याने उघडणार दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील १४ हजारांवर मजूर जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी कामासाठी गेलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत राज्याबाहेरील ६७१३ आणि इतर जिल्ह्यांमधून ७९९ मजूर परतलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यात अडकलेले आहेत. तेथील प्रशासनाकडून त्यांना महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आणून सोडण्यात येत आहे.

ठळक मुद्देआढावा बैठक : सीमाभागात व रेल्वेने आलेल्यांसाठी मोफत बसेसची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे त्यांच्या गावात पोहोचवण्यासाठी जिल्हा सीमेपासून मोफत बसेसची व्यवस्था करण्याचा निर्णय पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जाहीर केला. याशिवाय नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुढील चार दिवसात टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्यात येतील, मात्र नागरिकांनी आतापर्यंत केले तसे सहकार्य प्रशासनाला करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तिसरे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली.जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता व इतर महत्त्वाच्या विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.जिल्ह्यातील १४ हजारांवर मजूर जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी कामासाठी गेलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत राज्याबाहेरील ६७१३ आणि इतर जिल्ह्यांमधून ७९९ मजूर परतलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यात अडकलेले आहेत. तेथील प्रशासनाकडून त्यांना महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आणून सोडण्यात येत आहे. यानंतर अनेक मजूर पायीच स्वगावी जाण्यासाठी निघत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांचे असे पायी जाणे त्यांच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी या सर्व मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता मोफत बसेसची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या बसेस त्यासाठी वापरल्या जाणार आहेत.आंध्र प्रदेशमधून उद्या एक हजार मजुरांना घेऊन वडसा येथे रेल्वे येत आहे. त्यात ७ तालुक्यामधील विविध ठिकाणच्या मजुरांना मोफत बसद्वारे पोहोचवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. प्रशासनाकडून त्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे.अर्थव्यवस्थेची चाकं लवकरच फिरणारप्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या तसेच शारीरिक अंतर राखण्याचा अटीवर जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी तीन-चार दिवसात निर्णय घेत आहोत. गडचिरोली शहर तसेच तालुका मुख्यालयातील बाजारपेठांमधील दुकाने सुरू करण्याबाबत चार दिवसात निर्देश दिले जाणार आहे. अर्थव्यवस्थेची रूतलेली चाके लवकर फिरण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.तेंदुपत्ता संकलनाबाबतच्या अडचणी सोडवाजिल्ह्यातील तेंदूपत्ता संकलन सुरू होत आहे. मजुरांसह विविध कंत्राटदारांना यासाठी प्रवास व मजुरांची ने-आण करणे आवश्यक आहे. याबाबत काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासनाने याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्याचा मुख्य आर्थिक स्रोत हा तेंदूपत्ता असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल या व्यवसायातून होत असते. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन सुव्यवस्थित होईल याकडे प्रशासनाने लक्ष घालावे, असे ते यावेळी म्हणाले.प्रशासनाला सहकार्य कराबाहेरून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करून लक्षणे असणाºयांना विलगीकरण कक्षात ठेवले जाईल, तर इतरांना घरीच विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यांच्यावर गावातील समित्यांचे लक्ष राहील. जनतेने प्रशासनाला केलेल्या सहकार्यामुळेच गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. पुढेही हा जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcollectorजिल्हाधिकारी