शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

शेकापचा जिल्हा कचेरीवर बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:10 IST

शेतकरी व मजुरांच्या विविध समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देकृषीपंप देयकाची वसुली थांबवा : शेतकºयांच्या समस्यांबाबत शासन असंवेदनशील असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकरी व मजुरांच्या विविध समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.शेकापचे निमंत्रक रामदास जराते, रोहिदास कुमरे, महिला नेत्या जयश्री वेळदा आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. दुपारी १ वाजता तहसील कार्यालयापासून मोर्चास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तेथे रामदास जराते, रोहिदास कुमरे, जयश्री वेळदा यांनी उपस्थितांना संबोधित केले.यावेळी रामदास जराते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजुरांसाठी काहीच केले नाही. कर्जमाफी केल्यानंतरही अनेक शेतकºयांचे कर्जमाफ झाले नाही. जीएसटी लागू केल्याने महागाई वाढत असून, सामान्य नागरिकांचे जिणे कठीण झाले आहे. विद्यमाने सरकार शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी कमी आणि भांडवलदारांसाठी अधिक काम करीत असल्याचा आरोप रामदास जराते यांनी केला. २०१९ च्या निवडणुकीत शेतकरी या सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.धानाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकºयांना कर्जमाफीची आवश्यकता असताना सरकार मात्र शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसत आहे, असा आरोप जयश्री वेळदा यांनी केला. भाषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले. या मोर्चात श्यामसुंदर उराडे, विजया मेश्राम, प्रिया कुमरे, चंद्रकांत भोयर, श्रीधर मेश्राम, नरेश मेश्राम, वसंत भोपये, जयराम चिकराम, तांगळे, नागोसे, जांभुळकर, अशोक किरंगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनातील मागण्या६० वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या शेतकऱ्यांना एकरी एक हजार रुपये मासिक पेंशन सुरु करावे, सर्व शेतकऱ्यांचा विमा काढून सर्पदंश, वज्राघात, अपघात, आत्महत्या व रासायनिक औषधे फवारताना मृत्यू झाल्यास संबंधित शेतकरी व मजुरांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत करावी, कृषिपंपांच्या वीजबिलाची वसुली बंद करुन २०११ पासून आतापर्यंतच्या वीजबिलाची रक्कम माफ करावी, विकास प्रकल्पांच्या नावाने शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी कवडीमोल भावाने संपादित करुन त्या भांडवलदारांच्या घशात घालणे बंद करावे, प्रलंबित वैयक्तिक वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, तसेच त्यांना सातबारा वाटप करावे, शेतकºयांच्या मुलांची प्रलंबित शिष्यवृत्ती वितरीत करावी आदी मागण्या करण्यात आल्या.