शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

निविदा प्रक्रियेच्या कचाट्यात अडकली शापोआ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:46 IST

विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी व शाळेतील गळतीचे प्रमाण थांबावे, या उदात्त हेतुने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. मात्र सदर योजनेंतर्गत तांदूळ वाहतूक व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी नियुक्त केलेल्या पुरवठादाराची मुदत संपल्याने फेब्रुवारी महिन्यापासून शालेय पोषण आहाराचा पुरवठा बंद झाला आहे.

ठळक मुद्देआहाराचा पुरवठा थांबला : विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी व शाळेतील गळतीचे प्रमाण थांबावे, या उदात्त हेतुने शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. मात्र सदर योजनेंतर्गत तांदूळ वाहतूक व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी नियुक्त केलेल्या पुरवठादाराची मुदत संपल्याने फेब्रुवारी महिन्यापासून शालेय पोषण आहाराचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी शालेय पोषण आहार कुठून आणून शिजवायचा, असा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.जोपर्यंत निविदा पुरवठ्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही, तोपर्यंत शालेय पोषण आहाराचा पुरवठा होणार नसल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. शाळांना पोषण आहाराचा पुरवठा बंद असला तरी सदर योजना अखंडीतपणे सुरू ठेवण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शालेय पोषण आहार यंत्रणाही हतबल झाली आहे. शालेय पोषण आहार योजना केंद्रपुरस्कृत असून इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिल्या जाते. राज्यस्तरावर पुरवठादार व राज्य सरकार यांच्यातील मध्यान्ह भोजन संदर्भाने केलेला करार नोव्हेंबर २०१८ ला संपुष्टात आला आहे. नव्याने कुठलीच पर्यायी व्यवस्था उपलब्ध न केल्यामुळे फेब्रुवारी २०१९ पासून शाळांमधील तांदळाचा साठा संपलेला आहे.राज्य सरकारने तात्पुरती सोय म्हणून जानेवारी २०१९ पर्यंत पुरवठादारांना विनंती करून काही दिवसांसाठी साठा उपलब्ध करून दिला. परंतु फेब्रुवारी महिन्याची २० तारीख आली असताना पोषण आहार पुरवठ्याबाबत शासनाने कुठलीच पाऊले उचलली नाही. जिल्ह्याच्या शालेय पोषण आहार मुख्य अधीक्षकांनी याबाबत कुठलेच विधान केले नाही.शालेय पोषण आहार शिजविणारी यंत्रणा अथवा मुख्याध्यापक हतबल झाले आहेत. तांदूळ नसल्यामुळे पोषण आहार शिजवायचा कसा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावे ही दुष्काळग्रस्त असल्यामुळे पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत नियमित पाठवून घरच्या बिकट परिस्थितीचे काही प्रमाणात समायोजन करतात. विद्यार्थ्यांच्या समतोल विकासासाठी शासनाने सुरू केलेली पोषण आहार योजना सध्या पुरवठादार व शासनाच्या करारपत्रकात अडकली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक शासनाच्या योजनेविरूध्द बोलण्याचे धाडस करीत नसल्यामुळे तेही गप्प बसले आहेत. अनेकदा शालेय पोषण आहार अधीक्षकाला सूचना देऊन कुठलाच पाठपुरावा होत नाही. शालेय पोषण आहाराचा पुरवठा तत्काळ करावा, अशी मागणी होत आहे.उसनवार करून मुख्याध्यापकही थकलेकाही मुख्याध्यापक गावातील दानशूर व्यक्तीकडून तांदूळ घेऊन किंवा उसनवार घेऊन विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची तात्पुरती व्यवस्था करीत आहेत. परंतु आता तेही थकले आहेत. उसने मागायचे तरी किती मागायचे, असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाच्या संदर्भातील महत्त्वाचा विषय असतानाही निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी अडीच ते तीन महिन्याचा कालावधी का लागत आहे, असा सवालही पालकांसह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी करीत आहेत.शालेय पोषण आहार पुरवठाधारक आणि शासन यांच्यातील पोषण आहार पुरवठ्यासंदर्भातील करारनामा नोव्हेंबर २०१८ मध्ये संपला. डिसेंबर व जानेवारीपर्यंत या करारनाम्याला मुदतवाढ देण्यात आली. शासनस्तरावर निविदा प्रक्रिया आटोपलेली असून १४ फेब्रुवारीला करारनामे झाले. १८ फेब्रुवारीला पोषण आहार पुरवठा करण्याबाबत वर्कआर्डर दिले. त्यामुळे पुढच्या सोमवारपासून शाळांना पोषण आहाराचा पुरवठा होईल.- वैभव बारेकर, लेखाधिकारी,शालेय पोषण आहार शिक्षण विभाग, जि.प. गडचिरोली

टॅग्स :Schoolशाळा