शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शहीद परिवारांसोबत एसपींनी साजरी केली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 23:52 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वीर मरण पत्कराव्या लागलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. यामुळे शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कमी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत झाली.

ठळक मुद्देकुटुंबाचा आनंद झाला द्विगुणीत : जिल्हा पोलीस अधीक्षकांची अभिनव संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वीर मरण पत्कराव्या लागलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. यामुळे शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कमी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत झाली.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ.हरी बालाजी, उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) समिरसिंह साळवे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रदीप चौैगावकर व विशेष अभियान पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश खांडवे यांनी शहीद परिवारांना भेट देऊन त्यांना फराळ, शैक्षणिक साहित्य, भेटवस्तू दिल्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी एन दिवाळीच्या दिवशी घरी आल्याचे बघून शहीद परिवारातील सदस्यांचा आनंद द्विगुणीत झाला. भेटवस्तू दिल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी शहिदांच्या कुटुंबासोबत चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या. शहीद परिवाराला निर्माण होणाºया समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाºयांना दिले.आपला परिवार आनंदात जगावा, यासाठी रक्ताचे पाणी करणारा कुटुंब प्रमुखच आनंदाच्या क्षणी हजर नसल्याने त्याची उणीव शहिदांच्या कुटुंबांना प्रत्येक सणाच्यावेळी जाणवते. मात्र हे दु:ख पचवून शहिदांचे कुटुंब सण साजरे करत होते.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या अभिनव संकल्पनेतून दिवाळीनिमित्त शहिदांच्या कुटुंबांना भेट देण्याची संकल्पना राबविण्यात आली. त्यानुसार भेटी देऊन समस्या जाणल्या. पोलीस अधीक्षकांच्या या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले जात आहे.पोलीस अधीक्षकांनी जाणल्या अडीअडचणीकुटुंबाचा आधार असलेला व्यक्ती निघून गेल्यानंतर शहिदांच्या परिवारावर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. या दु:खांचा सामना करीत शहिदांचे कुटुंब जीवन जगत आहेत. दैनंदिन समस्यांसोबत प्रशासकीय समस्याही निर्माण झाल्या आहेत. यातील काही समस्या पोलीस विभागाशीच संबंधित आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वत: या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन शहिदांच्या कुटुंबांना दिले. तर समस्या सोडविण्याचे निर्देश पोलीस प्रशासनातील अधिकाºयांनी दिले. दोन्ही बाजूला मध्यस्थी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत. त्यामुळे आजपर्यंत ज्या प्रशासकीय समस्यांनी शहिदांचे कुटुंब त्रस्त झाले होते, त्या समस्या पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर सुटण्याची आशा आहे.

टॅग्स :Policeपोलिस