शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

शहीद परिवारांसोबत एसपींनी साजरी केली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 23:52 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वीर मरण पत्कराव्या लागलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. यामुळे शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कमी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत झाली.

ठळक मुद्देकुटुंबाचा आनंद झाला द्विगुणीत : जिल्हा पोलीस अधीक्षकांची अभिनव संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वीर मरण पत्कराव्या लागलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. यामुळे शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कमी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत झाली.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ.हरी बालाजी, उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) समिरसिंह साळवे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रदीप चौैगावकर व विशेष अभियान पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश खांडवे यांनी शहीद परिवारांना भेट देऊन त्यांना फराळ, शैक्षणिक साहित्य, भेटवस्तू दिल्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी एन दिवाळीच्या दिवशी घरी आल्याचे बघून शहीद परिवारातील सदस्यांचा आनंद द्विगुणीत झाला. भेटवस्तू दिल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी शहिदांच्या कुटुंबासोबत चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या. शहीद परिवाराला निर्माण होणाºया समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाºयांना दिले.आपला परिवार आनंदात जगावा, यासाठी रक्ताचे पाणी करणारा कुटुंब प्रमुखच आनंदाच्या क्षणी हजर नसल्याने त्याची उणीव शहिदांच्या कुटुंबांना प्रत्येक सणाच्यावेळी जाणवते. मात्र हे दु:ख पचवून शहिदांचे कुटुंब सण साजरे करत होते.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या अभिनव संकल्पनेतून दिवाळीनिमित्त शहिदांच्या कुटुंबांना भेट देण्याची संकल्पना राबविण्यात आली. त्यानुसार भेटी देऊन समस्या जाणल्या. पोलीस अधीक्षकांच्या या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले जात आहे.पोलीस अधीक्षकांनी जाणल्या अडीअडचणीकुटुंबाचा आधार असलेला व्यक्ती निघून गेल्यानंतर शहिदांच्या परिवारावर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. या दु:खांचा सामना करीत शहिदांचे कुटुंब जीवन जगत आहेत. दैनंदिन समस्यांसोबत प्रशासकीय समस्याही निर्माण झाल्या आहेत. यातील काही समस्या पोलीस विभागाशीच संबंधित आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वत: या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन शहिदांच्या कुटुंबांना दिले. तर समस्या सोडविण्याचे निर्देश पोलीस प्रशासनातील अधिकाºयांनी दिले. दोन्ही बाजूला मध्यस्थी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत. त्यामुळे आजपर्यंत ज्या प्रशासकीय समस्यांनी शहिदांचे कुटुंब त्रस्त झाले होते, त्या समस्या पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर सुटण्याची आशा आहे.

टॅग्स :Policeपोलिस