शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिला साहित्य संमेलनात उमटल्या जंगलातल्या जीवनछटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2023 20:21 IST

Gadchiroli News पारंपरिक पध्दतीने लुगडे-चोळी घालून सहभागी झालेल्या मुली, ढोलताशांवरील रेला नृत्य, डोक्याला मोरपंख लावलेले तरुण, पाहुण्यांच्या स्वागताला बांबू हस्तकलेचे डालगे तसेच साडीचोळी अशा जंगल, पहाडीतल्या जीवनछटांचे प्रतिबिंब आदिवासी महिला साहित्य संमेलनात उमटले.

 

गडचिरोली : पारंपरिक पध्दतीने लुगडे-चोळी घालून सहभागी झालेल्या मुली, ढोलताशांवरील रेला नृत्य, डोक्याला मोरपंख लावलेले तरुण, पाहुण्यांच्या स्वागताला बांबू हस्तकलेचे डालगे तसेच साडीचोळी अशा जंगल, पहाडीतल्या जीवनछटांचे प्रतिबिंब आदिवासी महिला साहित्य संमेलनात उमटले. लोकसाहित्याला आदिवासींच्या संस्कृतीचा साज चढवित उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सारस्वतांच्या मेळ्यात जल, जंगल, जमिनीवरील वाढत्या अतिक्रमणांकडे लक्ष वेधून ‘संविधान बचाव’ची हाक देण्यात आली.

शहरात आदिवासींच्या पहिल्या महिला साहित्य संमेलनास १५ एप्रिल रोजी सुरुवात करण्यात आली. इंदिरा गांधी चौकातून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नृत्याचे सादरीकरण, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला-पुरुषांसह शालेय विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. संमेलनाच्या मंचाला ज्येष्ठ समाजसेविका जंगोरायताड यांचे नाव दिले आहे. ज्येष्ठ साहित्यिका नजूबाई गावित यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मेघालयच्या प्रा. डॉ. स्ट्रीमलेट डखार अध्यक्षस्थानी होते, तर माजी आमदार हिरामण वरखडे स्वागताध्यक्ष होते. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. सतीश गोगुलवार, अशोक चौधरी, नंदा भील, रोहिदास राऊत, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, साहित्यिका कुसूम आलाम, केशवशहा आत्राम, अशोक श्रीमाली यांची उपस्थिती होती. साहित्य संमेलनातून १३ राज्यांतील साहित्यिकांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.

वेदनांना फुटावी साहित्यातून वाचा

संमेलनाध्यक्षा प्रा. डॉ. स्ट्रीमलेट डखार यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आदिवासी महिलांचे पहिले साहित्य संमेलन होत आहे, ही प्रशंसनीय बाब असल्याचे सांगितले. आदिवासी साहित्यातून दुर्गम भागातील महिलांच्या वेदनांना वाचा फुटायला हवी. आदिवासी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे संमेलन असून, यातून आदिवासींचा आवाज बुलंद होईल, असा विश्वास व्यक्त केला.

 

आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याचा डाव

आपले संपूर्ण आयुष्य दुर्गम, अतिदुर्गम भागातील घनदाट जंगलात व्यतीत करणारे आदिवासी हेच जंगलाचे खरे हक्कदार आहेत. त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा डाव पध्दतशीरपणे आखला जात आहे. लोहखाणींमध्ये बेसुमार उत्खनन सुरू आहे, प्रदूषण वाढत आहे, निसर्गाचे सौंदर्य हिरावले जात आहे. आदिवासींना, ग्रामसभांना न विचारता हे अतिक्रमण सुरू असल्याची खंत साहित्यिका कुसूम आलाम यांनी व्यक्त केली.

 

हिंदी, मराठी, इंग्रजीसह आदिवासी भाषांतून एकतेचा संदेश

या संमेलनात उपस्थित मान्यवरांनी हिंदी, मराठीतून भाषण केले, तर संमेलनाध्यक्षा प्रा. डॉ. स्ट्रीमलेट डखार यांनी इंग्रजीतून मार्गदर्शन केले. नंतर द्विभाषकाने त्यांचे भाषण मराठीत उपस्थितांसमोर ठेवले. संमेलनात आदिवासी, माडिया या भाषेचा प्रभावदेखील दिसून आला. वृक्ष, वेली, पशु-पक्षी, खळखळ वाहणाऱ्या नद्या, निसर्गाची मुक्त उधळण व त्यातील आदिवासींचे लोकजीवन साहित्यातून प्रतिबिंबित झाले होते.

 

......

टॅग्स :literatureसाहित्य