शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सावंगीत भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:25 IST

तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देनळयोजना कुचकामी : प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागते टँकरद्वारे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.देसाईगंज तालुक्यातील सावंगी या गावात ग्राम पंचायतची नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु जलपातळी खालावल्याने पाणी टंचाईचीही समस्या निर्माण झाली आहे. शिवाय गावाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे जुनीच नळ योजना गावात पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाही. येथे वाढत्या लोकसंख्येनुसार वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करणे गरजेचे आहे. परंतु नवीन प्रस्तावित नळयोजनेचा प्रस्ताव धूळखात असल्याचे दिसून येते. गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने सदर आरोग्य केंद्राला नळ योजनेचा लाभ देणे शक्य नाही. यातून मार्ग काढण्यासाठी आरोग्य केंद्रात दोन बोरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सध्यास्थितीत जलपातळी खालावल्याने बोरही कुचकामी ठरत आहे. येथील आरोग्य केंद्रात वास्तव्यास असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.आरोग्य केंद्रातील पाण्याची ही भीषण समस्या लक्षात घेता यावर मात करण्यासाठी सरपंच राजू बुल्ले यांच्या पुढाकाराने सध्या टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने गावातील नागारिकांसह आरोग्य केंद्रातील रूग्णांना जबर फटका बसत आहे. त्यामुळे सावंगी येथे प्रस्तावित नळ योजना तत्काळ कार्यान्वित करावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.बाहेर जिल्ह्यातील रूग्ण होतात दाखलदेसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण आरोग्य केंद्र म्हणून सावंगीची ओळख आहे. या केंद्रांतर्गत सावंगी, गांधीनगर, आमगाव, नवीन लाडज, विसोरा, एकलपूर आदी सहा गावे समाविष्ट असून लगतच्या सोनी, चप्राड, इंदोरा आदी गावातील गरोदर माता येथीलच आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात. प्रसंगी बाळंतपणासाठी गरोदर मातांना आरोग्य केंद्रात भरती राहावे लागत असल्याने भीषण पाणीटंचाईचा येथील रुग्णांनाही जबर फटका बसू लागला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई