शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

सावंगीत भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:25 IST

तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देनळयोजना कुचकामी : प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागते टँकरद्वारे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.देसाईगंज तालुक्यातील सावंगी या गावात ग्राम पंचायतची नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु जलपातळी खालावल्याने पाणी टंचाईचीही समस्या निर्माण झाली आहे. शिवाय गावाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे जुनीच नळ योजना गावात पाणीपुरवठा करण्यास सक्षम नाही. येथे वाढत्या लोकसंख्येनुसार वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करणे गरजेचे आहे. परंतु नवीन प्रस्तावित नळयोजनेचा प्रस्ताव धूळखात असल्याचे दिसून येते. गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने सदर आरोग्य केंद्राला नळ योजनेचा लाभ देणे शक्य नाही. यातून मार्ग काढण्यासाठी आरोग्य केंद्रात दोन बोरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सध्यास्थितीत जलपातळी खालावल्याने बोरही कुचकामी ठरत आहे. येथील आरोग्य केंद्रात वास्तव्यास असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.आरोग्य केंद्रातील पाण्याची ही भीषण समस्या लक्षात घेता यावर मात करण्यासाठी सरपंच राजू बुल्ले यांच्या पुढाकाराने सध्या टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने गावातील नागारिकांसह आरोग्य केंद्रातील रूग्णांना जबर फटका बसत आहे. त्यामुळे सावंगी येथे प्रस्तावित नळ योजना तत्काळ कार्यान्वित करावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.बाहेर जिल्ह्यातील रूग्ण होतात दाखलदेसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण आरोग्य केंद्र म्हणून सावंगीची ओळख आहे. या केंद्रांतर्गत सावंगी, गांधीनगर, आमगाव, नवीन लाडज, विसोरा, एकलपूर आदी सहा गावे समाविष्ट असून लगतच्या सोनी, चप्राड, इंदोरा आदी गावातील गरोदर माता येथीलच आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात. प्रसंगी बाळंतपणासाठी गरोदर मातांना आरोग्य केंद्रात भरती राहावे लागत असल्याने भीषण पाणीटंचाईचा येथील रुग्णांनाही जबर फटका बसू लागला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई